शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात मिळणार ‘सेलडीड’

By admin | Updated: December 16, 2014 01:14 IST

गेल्या १९ वर्षांपासून ‘सेलडीड’ किंवा तत्सम मालकी हक्क दस्तऐवजाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्रिमूर्तीनगर ‘म्हाडा’ वसाहतीतील ४०० गाळेधारकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

प्रकाश मेहता यांची ग्वाही : ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना निर्देशनागपूर : गेल्या १९ वर्षांपासून ‘सेलडीड’ किंवा तत्सम मालकी हक्क दस्तऐवजाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्रिमूर्तीनगर ‘म्हाडा’ वसाहतीतील ४०० गाळेधारकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. या गाळेधारकांना दोन महिन्यात ‘सेलडीड’ देण्यात येईल, अशी ग्वाही गृहनिर्माण, कामगार व खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. लोकमत नागपूर आवृत्तीच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त मेहता यांनी सोमवारी लोकमत भवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.या गाळेधारकांवर झालेल्या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. १९८६ ते १९९५ या १० वर्षांत गाळेधारकांनी म्हाडाकडे मासिक किश्तीने गाळ्यांची पूर्ण किंमत जमा केली. पण म्हाडाने सेलडीड किंवा मालकी हक्काचे दस्तऐवज करून दिले नाही. मेहता यांनी याची गंभीरपणे दखल घेतली. ‘सेलडीड’ मिळायला उशीर का झाला, यासंदर्भात ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना सर्व माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा मुद्दा दोन महिन्यात सोडवू, असे ते म्हणाले. यापुढे कुठल्याही गाळेधारकाला मालकीहक्काची कागदपत्रे वेळेतच मिळतील अशी सूचना देण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.नागपूर शहरातील ‘फ्लॅट’च्या किमती बिल्डरांमुळेच वाढत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सात मजली इमारत बांधण्यासाठी प्रति चौरस फूट खर्च १२०० रुपयाच्या आसपास येतो. परंतु त्याला वाढवून २२०० रुपये प्रति चौरस फूट असल्याचे सांगण्यात येते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.चार वर्षांत दोन लाख घरे उभारणारमुंबईकरांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्याचा राज्य शासनाचा मानस असून, येत्या चार वर्षांत दोन लाखांहून घरे बांधण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती प्रकाश मेहता यांनी दिली. मुंबईमध्ये जागेची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे गृहनिर्माणासाठी पूर्व उपनगरांतील मिठागारांच्या जमिनीचा उपयोग करण्याचे शासनाने ठरविले आहे. येथे सुमारे १,२५० हेक्टर जमीन उपलब्ध आहे. यातील अर्ध्या जागेवर ‘मेगासिटी’ तर उर्वरित जागेवर परवडणाऱ्या किमतीची घरे ‘म्हाडा’तर्फे बांधण्यात येतील. शिवाय ‘ग्रीन बेल्ट’ व ‘नो डेव्हलमेंट झोन’मधील जागांचादेखील वापर करण्यात येईल, अशी माहिती प्रकाश मेहता यांनी दिली.रोजगाराच्या संधी वाढत असल्यामुळे कामगार चळवळीत घट दिसून येत आहे. कामगारांच्या हिताला कुठेही बाधा पोहोचणार नाही, असे बदल कामगार कायद्यात करण्यात येतील. उद्योजक व कामगारांमध्ये समन्वय साधण्याचे आमचे प्रयत्न असतील. कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याची शासनाची योजना आहे, असेदेखील ते म्हणाले. (प्रतिनिधी)