शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

सातारचे पोलीस म्हणतात, गडचिरोली नको रे बाबा..!

By admin | Updated: December 29, 2014 00:04 IST

पोलिसांचा शून्य प्रतिसाद : बढतीचा निर्णय तरीही नक्षलवादी भागात जाण्यास नकार

मोहन मस्कर-पाटील - सातारा -‘नक्षलग्रस्त गडचिरोलीत जा, बढती मिळवा,’ या गृहविभागाच्या आवाहनास सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी ठेंगा दाखविला आहे. विशेष म्हणजे, गृह विभागाने येथे नियुक्तीचा निर्णय घेत असताना बढतीचे इतर नियम, निकष बाजूला ठेवले आहेत. तरीही सातारचे पोलीस ‘गडचिरोली नको रे बाबा...’ म्हणत आहेत.गृहविभागाने विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत हवालदारांना ‘सहायक फौजदार’पदी बढतीचा निर्णय घेतला आहे. इतर काही पदांचाही त्यात समावेश केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत नेहमीच नक्षलवादी विरुद्ध पोलीस आणि स्थानिक, असा संघर्ष असतो. गेल्या दहा वर्षांत हजारोंना प्राण गमवावा लागला आहे. परिणामी येथे काम करण्यास पोलीस उत्सुक नसतात. पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेल्यांना सुरुवातीच्या काळात काही दिवस येथे काम करावे लागते. त्यामुळे येथे त्यांचा प्रश्न निकालात निघतो. मात्र, इतर पदांच्या बाबतीत तसे नाही. येथे सहायक फौजदार त्याचबरोबर इतर पदे येथे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातच गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया भागात पोलिसांची कमतरता आहे, परिणामी नक्षलवाद विरोधात मोहीम राबविताना शासनापुढे असंख्य अडचणी आहेत. त्यावर विचार करून राज्याच्या गृहविभागाने महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘पोलिसांनो बढती हवी, तर मग चला गडचिरोलीला...’ असे नमूद करत नक्षलवादी भागात काम करण्यासाठी आवाहन केले होते. हे आवाहन करत असतानाच गृह विभागाने सर्व निकष बाजूला ठेवून त्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांना तातडीने (वेगवर्धित) बदली देण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, त्याकडे पाठच फिरविली आहे. विशेष म्हणजे, या आवाहनास मूळचे गडचिरोलीचे असणारे मात्र, इतर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती पुढे आली आहे. नोव्हेंबर महिन्यात गृह विभागाने राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना जे हवालदार बढती घेऊन सहायक फौजदार होण्यास इच्छुक आहेत, त्यांच्याकडून अर्ज भरून घेऊन माहिती संकलनास सांगितले होते. यासाठी दि. १५ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली होती. त्यानुसार सातारचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्वच पोलीस ठाणे प्रमुखांना कळविले होते. मात्र, दि. १५ डिसेंबरपर्यंत एकही अर्ज पोलीस अधीक्षकांकडे आला नव्हता. दरम्यान, ही तारीख उलटून आता पंधरा दिवस झाले तरी सातारच्या पोलिसांनी या निर्णयाला नापसंतीच दर्शविली आहे.अशी होती योजना‘बढती हवी... चला गडचिरोलीला...’ या गृहविभागाच्या योजनेअंतर्गत राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार होते. जे गडचिरोलीला जाण्यास तयार होतील, त्यांना तत्काळ एक बढती देऊनच येथे रुजू करून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही बढती कायम राहून सेवा ज्येष्ठता यादीतही संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नाव येणार होते. मात्र, साताऱ्यात कार्यरत पोलिसांनी त्यास नकार दिल्यामुळे बढतीचा आता प्रश्नच येत नाही....का नको गडचिरोलीदेशात वीस राज्ये नक्षलग्रस्त असून, महाराष्ट्रात गडचिरोली सर्वाधिक नक्षलवादी प्रभावी जिल्हा आहे. त्यापाठोपाठ गोंदिया, चंद्रपूर जिल्हे आहेत. देशभरात दरवर्षी जे नक्षलवादी हल्ले होतात, त्यापैकी गडचिरोली जिल्ह्याचे हल्ल्याचे सहा टक्के तर शहीद होण्याचे प्रमाण नऊ टक्के आहे. येथे दरवर्षी शंभरच्या आसपास पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक नक्षली हल्ल्यात बळी पडतात. त्यामुळे गडचिरोली नाव उच्चारले तरी नवीन पोलिसांना येथे रुजू होताना काटा येतो.