“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:50 IST2026-04-25T12:48:14+5:302026-04-25T12:50:55+5:30
Sanjay Raut News: बकासूराने पुन्हा जन्म घेतला आहे, तो भाजपा झाला आहे. भाजपाने भारताला नरक बनवले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Sanjay Raut News: महाभारतात बकासूर नावाचा राक्षस होता, त्यांचे पोट कधीही भरत नसे, तीच अवस्था आता भाजपाची झालेली आहे. बकासूराने पुन्हा जन्म घेतला आहे, तो भाजपा झाला आहे. ट्रम्प म्हणाले होते की, नरक झाला आहे, भाजपाने भारताला नरक बनवले आहे. नरक असलेल्या पक्षात हे खासदार गेले आहे, हे त्यांच्या लक्षात येईल, या शब्दांत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोला केला.
आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आप आमदी पक्षाला खूप मोठा राजकीय धक्का बसला. आप खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह सात जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असून, पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली. आमच्यावर प्रयत्न झाले, पण आम्ही मात्र घाबरलो नाही. मला अटक केली, पार्टी सोडा, परंतु, पार्टी सोडली नाही. आम्ही रस्त्यावर लोक आहे आमचे काय वाकडे करणार. हे लोक देशात घाण पसरवत आहे. भाजपाचे टंम्पिंग ग्राऊंड झाले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ईडीचे छापे पडले आणि राजकीय भूकंप झाला
भाजपा निर्लज्ज झाली आहे. तिने लाज सोडली आहे. राघव चड्ढासारखे काही लोक माझेही मित्र होते. कालपर्यंत राघव चड्ढा हे भाजपाला गुंडांचा पक्ष म्हणत होते. संजय मित्तल आणि संजय पाठक आणि इतरही खासदारांची भाषाही अशीच होती. आता हे सर्व लोक होलसेलमध्ये गुंडांच्या पक्षात गेले. आपने संजय मित्तल यांना राघव चड्ढा यांच्याऐवजी राज्यसभेत पक्षाचा उपनेता केले, त्याने मला धक्का बसला. तेव्हा मित्तल आनंदी होते. अचानक त्यांच्या काही संस्थांवर ईडीची कारवाई झाली. ईडीचे छापे पडले आणि राजकीय भूकंप झाला, असा दावा संजय राऊतांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे दु:खी आहे, सुनावणी होत नाही, संविधाची हत्या झाली तरी सुनावणी होत नाही. निवडणुक आयोग आणि न्यायालयाडून न्यायाची अपेक्षा नाही. साडेचार वर्षे झाली तर सुनावणी होत नाही, तुम्ही असे कोणते काम करत आहात, हे आम्हालाही कळू द्या, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.