शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुक: राष्ट्रवादीच्या पाठींब्यासाठी पवारांची भेट घेणार: आमदार सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:21 AM

निर्णय झाला नाही तरीही शिवसेना स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असेही आमदार सामंत म्हणाले.

रत्नागिरी: नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साळवी यांचा विजय नक्की आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने रत्नागिरीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी आपण दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पाठिंब्यासाठी विनंती करणार आहे, अशी माहिती शिवसेना आमदार उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

साळवी यांचा अर्ज भरताना नगरपरिषद जवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे विजय हा शिवसेनेचाच होणार याबाबत आम्हाला खात्री आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना बंड्या साळवी यांनी शहरात अनेक उपक्रम राबविले. ६३ कोटींच्या नळपाणी योजनेचे काम ही युद्धपातळीवर सुरु आहे. पावसामुळे रत्नागिरी शहरात जे रस्त्यांवर खड्डे पडले होते, त्याचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. जिल्हा नगरोत्थानमधून जो निधी मिळाला आहे, त्यातील कामेही सुरु झाली असल्याचे सामंत म्हणाले.

या पार्श्वभूमीवर २९ डिसेंबरला जे काही मतदान रत्नागिरीत होईल, त्यापैकी ७० टक्के मते ही शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळयी यांना मिळतील. रत्नागिरी महाराष्ट्र विकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पाठिंबा दिल्यास त्याबाबत उमेदवार माघार घेईपर्यंत निर्णय होऊ शकेल. तसेच शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठींबा मिळावा म्हणून शरद पवारांची भेट घेणार असल्याचे सुद्धा आमदार सामंत म्हणाले. परंतु निर्णय झाला नाही तरीही शिवसेना स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असेही आमदार सामंत म्हणाले.

दोन दिवसांपूर्वीच भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झाला आहे. त्यांचा आरोप आहे की, रत्नागिरी शहरातील रस्त्यांचा, विकासाचा शिवसेनेने बट्ट्याबोळ करून टाकला आहे, याबाबत आपले काय मत आहे, असे विचारता सामंत म्हणाले, त्यांनी काय म्हटले, यापेक्षा मतदारांवर आमचा विश्वास आहे. राहुल पंडित यांनी व्यक्तीगत कारणाने त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ही निवडणूक लादल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचे सुद्धा सामंत म्हणाले.