शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

पावसाचा तडाखा सुरूच; कोकण विभागात काही ठिकाणी रेड, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 06:20 IST

पावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट.

ठळक मुद्देपावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार.रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट.

मुंबईसह महाराष्ट्रात बुधवारीदेखील मान्सूनचा तडाखा सुरूच होता. मंगळवारी आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार असून, कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याला रेड तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत गुरुवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. दुपारी काही काळ पाऊस थांबला. सायंकाळी पुन्हा पावसाने वेग पकडला. मात्र सायंकाळी पावसाचा जोर संथ होता. पावसाची रिमझिम सुरू असतानाच एकूण चार ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. मंगळवारी रात्री ९ वाजता माझगाव येथील जम जम मस्जिदशेजारी असलेली संरक्षक भिंत कोसळून रिझवान सय्यद हे ज्येष्ठ नागरिक किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले, तर एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. १५ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या असून, गुरुवारी देखील मुंबईत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

१५ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. १६ जुलै रोजी देखील कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. 

१५ मिनिटांच्या अंतराने वर्तवणार हवामान अंदाज आता २४ तासांऐवजी १५ मिनिटांच्या अंतराने हवामान अंदाज वर्तवण्याचा विचार सुरू आहे, असे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी सांगितले. हवामान अंदाजांबाबतच्या वाढीव मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले अभिप्राय जाणून घेण्याच्या उद्देशाने आयआयटीएमने पवन आणि सौरउर्जा निर्मितीसाठी ‘हवामानशास्त्रीय भाकीत : सद्यस्थिती आणि भविष्यकालीन दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रामध्ये ते बोलत होते.

डॉ. एम राजीवन म्हणाले, ‘‘भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्था, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग यांसारख्या भूविज्ञान मंत्रालयाच्या संस्था पवन आणि सौर उर्जाविषयक हवामानाचे अंदाज जारी करत असतात. विविध हितधारकांकडून वाऱ्यांचा वेग, ढगांचे आच्छादन आणि सौर किरणोत्सार लहरीच्या अंदाजांची विचारणा होत असते. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित हवामान शास्त्रविषयक भाकिते आणखी अचूक करण्यासाठी भूविज्ञान मंत्रालय २०२१ ते २०२६ या नियोजन कालावधीमध्ये या भाकितांशी संबंधित विविध प्रकारच्या कामांना आणखी बळकटी देणार आहे.

नव्या, नूतनक्षम ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्यासाठी, जीवाश्म इंधनांचा वापर कमी करण्यासाठी आवश्यक पर्यायांची चाचपणी केली जात आहे. पवन ऊर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी हवामानाचे भाकीत महत्त्वाचे असते. ताशी १५ किमीपेक्षा कमी गतीने वारे वाहणाऱ्या आणि डोंगराळ भागात पवनऊर्जा निर्मितीसाठी हवामानाचे भाकीत अचूक असणे आवश्यक असते. सौर उर्जा निर्मितीसाठी निरभ्र आकाश असताना भाकीत करणे सोपे असते; मात्र ढगाळ वातावरण असताना सूर्यप्रकाशाबाबतचे भाकीत करणे अवघड होते, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रkonkanकोकणRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गPuneपुणेkolhapurकोल्हापूरweatherहवामान