शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 06:53 IST

रायगड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाने जोर धरला असून, शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात मुरुड येथे सर्वाधिक १३४ मि.मी. तर पनवेल येथे १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाने जोर धरला असून, शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात मुरुड येथे सर्वाधिक १३४ मि.मी. तर पनवेल येथे १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अलिबाग-४४, पेण-३८, उरण-७२, कर्जत-१२.२०, खालापूर-४४, माणगाव-६०, रोहा-४२, सुधागड-२०, तळा-५५, महाड-४०, पोलादपूर-३९, म्हसळा-९५.२०, श्रीवर्धन- ९५.२० आणि माथेरान येथे २७.५० मि.मी. तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५९.४२ मि.मी. आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासात आपल्या ट्रेनचा वेग नियंत्रित केला आहे. परिणामी, कोकण रेल्वे काहीशा विलंबाने धावत आहे.पाणीच पाणीपनवेल तालुक्यातील विमानतळबाधित कोंबडभुजे गावात पहिल्याच पावसात पाणीच पाणी साचले. यात ८ ते १० घरांत पाणी शिरले असून सिडकोने केलेल्या भरावामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे ग्रामस्थांनी म्हणणे आहे.विमानतळाच्या कामाचा परिणामच्विमानतळाचे काम सुरू झाल्यापासून गावात पावसाचे पाणी येत आहे. गतवर्षीही पाणी गावात घुसले होते, यावर्षी ही परिस्थिती आणखी भयानक होणार असल्याचे मत सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.च्नामदेव कोळी, दत्तात्रेय कोळी, दीनानाथ कोळी, केशव कोळी, संतोष कोळी, सुरेश पाटील यांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.च्नवी मुंबई विमानतळ भरावामुळे कोंबडभुजे गावात व प्राथमिक शाळेत पावसाच्या पुराचे पाणी जाऊन मनुष्य व वित्तीयहानी होण्याची शक्यता असल्याचा पत्रव्यवहार सिडकोकडे करण्यात आलेला आहे.भीतीचे वातावरणच्पनवेल परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळाचे काम सुरू आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावाच्या स्थलांतराचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. गावातून स्थलांतरित होण्यास काहींचा विरोध आजही कायम आहे. गावाच्या आजूबाजूला माती व दगडांचा भराव केला जात आहे. कोंबडभुजे गावातील नाल्यात विमानतळाच्या भरावाची माती गेल्याने नाला बुजला आहे. त्यामुळे ८ जून रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचा गावातील काही घरांना फटका बसला.च्पावसाचे पाणी घरात घुसल्याने गावातील १० घरांचे नुकसान झाले. तर जिल्हा परिषदेच्या शाळेतदेखील पाणी शिरले. पहिल्याच पावसात कोंबडभुजे गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या वेळी तलाठ्यातर्फे पंचनामा करण्यात आला आहे.शंभर वर्षांहून जुना वटवृक्ष कोसळलापनवेल : संपूर्ण गावच नव्हे, तर खारघर शहर नव्याने विकसित झाल्याची साक्ष देणारे कोपरा गावातील १०० वर्षाहून जुना वटवृक्ष शनिवारी सकाळी उन्मळून पडला. वादळी वाऱ्यामुळे गेला दोन-तीन दिवसांपासून परिसरात वृक्ष कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. हे वृक्ष वीज खांब अथवा वीज वाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. शुक्र वारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हा वटवृक्ष कोसळला असल्याचे बोलले जात आहे. या वेळी झाडाखाली उभ्या असलेल्या गाड्यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.मुरुड परिसरात२२ तास वीज खंडितच्बोर्ली मांडला : दीव आणि सावरोली दरम्यान असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या ट्रान्सफार्मरवर वीज पडल्याने बोर्ली मांडला विभागासहित साळाव, चोरडे, आणि कोकबन विभागातील विद्युत प्रवाह २२ तासांहून अधिक काळ खंडित झाला आहे.च्शुक्र वारी संध्याकाळी ७च्या सुमारास मुसळधार पावसामुळे मुरूड तालुक्यात विद्युतपुरवठा खंडित झाला होता. शनिवारी सावली ते काशीदपर्यंतचा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, बारशिव ते तलेखार कोकबनपर्यंतचा विद्युतपुरवठा २२ तास उलटले तरी सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.च्याबाबत मुरुड विभागातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे उपअभियंता सचिन येरेकर यांच्याकडे विचारणा केली असता, ट्रान्सफार्मरवर वीज पडल्याने पुरवठा खंडित झाला असून, कर्मचारी रात्रभर पावसात काम करीत आहेत. लवकरच सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :newsबातम्याRainपाऊस