शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची तयारी सुरू

By admin | Updated: June 19, 2017 01:29 IST

मुंबईत ९ आॅगस्टला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठक झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुंबईत ९ आॅगस्टला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठक झाली. त्यात मोर्चाचा प्राथमिक नियोजन आराखडा मांडण्यात आला.
आराखड्याविषयी मुंबई पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर २५ जुलैला मुंबईत बैठक घेऊन संपूर्ण राज्यभरातून येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांना मुंबईत येण्यासाठीचे नियोजन कळविण्यात येईल. औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर, पुणे, अमरावती, नागपूर, बुलडाणा, जालना, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग, धुळे आदी जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग नोंदविला व मत मांडले.
सूक्ष्म नियोजन होणार
महिला व ज्येष्ठ नागरिकांची व्यवस्था करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये व नगरपालिकेची मैदाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता बैठकीत
व्यक्त झाली.
मुंबईतील मराठा समाजाच्या कु टुंबीयांनी त्यांच्या गावातून आणि परिसरातून मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांची आपल्या घरीच व्यवस्था करावी, असे ठरले.
रेल्वे आरक्षणाबाबतही चर्चा झाली. जालना जिल्ह्यातील प्रतिनिधींनी जिल्ह्यातून सहभागी होणाऱ्या समाज बांधवांसाठी एक संपूर्ण रेल्वेगाडीचे आरक्षण करण्याची तयारी दाखविली. त्यांच्या सूचनेला बहुतांश जिल्ह्यातील प्रतिनिधींनी सहमती दर्शविली.

बैठकीतील ठराव
मराठा संघटनांच्या सहभागातून कोपर्डीत १३ जुलैला कॅण्डलमार्च काढणे.
राज्यात २४ जूनला एकाचवेळी जिल्हास्तरीय बैठक घेऊन मुंबई मोर्चाचे नियोजन करणे.गाव, तालुका, जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करून दर तीन दिवसांनी तयारीचा आढावा घेणे. समिती सदस्यांनी मोर्चाच्या तीन दिवस आधी मुंबईत जाऊन जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांचे, मोर्चेकऱ्यांच्या निवासाचे जिल्हावार नियोजन करणे.जिल्हास्तरीय समितीने मुंबईत महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी व निवासस्थानासाठी मदत करणे.मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी राज्यस्तरावर १० तज्ज्ञ वकिलांची उच्चस्तरीय समिती नेमणे.

मुंबईत कॅण्डल मार्च
कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेला १३ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबई समितीने १३ जुलैला सायंकाळी ‘गेट वे आॅफ इंडिया’ येथे ‘कॅण्डल मार्च’ काढणार असल्याचे सांगितले. महामुंबई समितीने ‘मराठा जोडो अभियान’ राबवण्याची घोषणा केली.