शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

४१ पैकी एकट्या ३ मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३२० कोटी ६४ लाखांची मुद्रांक माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:58 IST

शासनाने राबवलेल्या मुद्रांक शुल्क अभय योजनांतर्गत लाखोंची मुद्रांक व दंड माफी केल्याची माहिती अधिकारात समोर आले.

शासनाने राबवलेल्या मुद्रांक शुल्क अभय योजनामध्ये राज्यातील ४१ मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांपैकी ठाणे शहर, बोरिवली व अंधेरी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रात १०० टक्के मुद्रांक व शास्ती माफी अनुषंगाने तब्बल  ३२० कोटी ६४ लाखांची मुद्रांक व दंड माफी केल्याचे माहिती अधिकारात समोर आले. अन्य ३८ कार्यालयांची माहिती दिली जात नसली तरी कर बुडव्यांना काही हजार कोटींची माफी दिली गेली.

मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात अनोंदणीकृत करारनाम्यांच्या आधारे कायद्याचे उल्लंघन करून व शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवून झालेल्या व्यवहारांच्या तक्रारी ग्रामस्थ अमोल रकवी यांनी शासनाकडे सातत्याने चालवल्या होत्या. एकट्या मीरा भाईंदरमध्ये शासनाला कोट्यावधी रुपयांचा चुना लावला गेला असून शेतकरी, जमीन मालक यांना जमिनीचा मोबदला नाममात्र द्यायचा आणि अनोंदणीकृत कुलमुखत्यारद्वारे त्याच जमिनी अन्यत्र विक्री, हस्तांतरित केल्या गेल्या. जमिनीची कायदेशीर मालकी नसताना देखील महापालिकेने विकासकांना बांधकाम परवानगी दिल्याच्या तक्रारी रकवी यांनी पुराव्यांसह केल्या आहेत. 

दरम्यान शासनाने  डिसेम्बर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ दोन टप्प्यात अमलात आणली. त्यात  १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेम्बर २००० काळातील प्रलंबित मुद्रांक शुल्क आणि त्यावर आकारलेला दंड असे पूर्णपणे १०० टक्के माफ करण्यात आला. रकवी यांनी मुद्रांक शुल्क व दंड माफीची माहिती राज्याच्या मुद्रांक निरीक्षक यांच्याकडे मागितली होती. 

राज्यातील ४१ पैकी केवळ ३ मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने अभय योजनेतील १०० टक्के शुल्क व दंड माफ केलेल्या प्रकरणाची माहिती रकवी यांना दिली आहे. ठाणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात अभय योजनेच्या १०० टक्के माफीसाठीचे २ हजार ६९३ अर्ज आले. त्यानुसार १२ कोटी ५१ लाख २५ हजार ६५० मुद्रांक शुल्क माफी तर  १२ कोटी ५१ लाख २५ हजार ६४८ रुपये इतका दंड असे एकूण २५ कोटी २ लाख ५१ हजार २९८ रुपये माफ केले गेले. 

मुद्रांक जिल्हाधिकारी बोरिवली कार्यालयात १०० टक्के माफीचे ५ हजार २०९ अर्ज आले. त्यानुसार ३४ कोटी ८९ लाख १० हजार ५८४ मुद्रांक शुल्क माफी तर १३९ कोटी ५६ लाख ४२ हजार ३३६ रुपये इतकी दंड माफी असे एकूण तब्बल १७४ कोटी ४५ लाख ५२ हजार ९२० रुपये माफ केले गेले. अंधेरी तालुका कार्यालयकडे १०० टक्के माफीचे ६ हजार ६२३ अर्ज आले.  त्याची मुद्रांक माफी २५ कोटी २४ लाख २२ हजार ४००  रुपये तर ९५ कोटी ९२ लाख ५ हजार १२० इतका दंड असे एकूण एकूण १२१ कोटी १६ लाख २७ हजार २५० रुपये माफ केले गेले. 

राज्यावर कर्जाचा डोंगर असताना आणि सामान्य नागरिकांवर महागाई व कराचे ओझे असताना मुद्रांक शुल्क बुडवणाऱ्याना काही हजार कोटी रुपयांची माफी हा सामान्य करदात्या नागरिकांवर अन्याय असल्याचे अमोल रकवी म्हणाले. १०० टक्के मुद्रांक शुल्क व दंड माफीची केवळ ३ कार्यालयांची माफीची आकडेवारी ३२० कोटी पेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्यातील अन्य ३८ जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रातील १०० टक्के माफीची आकडेवारी काही हजार कोटीत असण्याची शक्यता आहे. याशिवाय, शासनाने १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेम्बर २०२० या २० वर्षांच्या काळातील मुद्रांक शुल्क बुडव्यांसाठी १० ते २५ टक्के मुद्रांक माफी आणि तब्बल ८० ते ९० टक्के दंडाच्या रकमेत माफी दिलेली आहे. ही भरघोस माफीची आकडेवारी देखील काही हजार कोटींच्या घरात असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रthaneठाणे