शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
5
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
6
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
7
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
8
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
9
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
10
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
11
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
12
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
13
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
14
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
15
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
16
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
17
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
18
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
19
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
20
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची डाळ शिजू देणार नाही

By admin | Updated: October 8, 2014 23:02 IST

नारायण राणे : मसुरे येथील प्रचारसभेत मोदींवर टीका

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जिल्ह्याची मागासलेला ही ओळख पुसून टाकण्याचे काम मी केले. आमदार, मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता या विविध पदांच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्य, शिक्षणाच्या गरजा पूर्ण केल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडलो नाही. मी असेपर्यंत विरोधकांची डाळ शिजू देणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख नारायण राणे यांनी केले. मसुरे येथील प्रचार सभेत ते बोलत होते. राणे म्हणाले, मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत पहिल्यांदाच अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी ९८ कोटी रूपये मंजूर करीत ३२ पुलांची कामे केली. पिण्याच्या पाण्यासाठी ११९ कोटी रूपये दिले, त्यामुळे टॅँकरमुक्ती मिळाली. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सर्वच क्षेत्रांसाठी आपण भरघोस निधी दिला. १९९० साली या जिल्ह्याला ६ कोटी रूपये निधी उपलब्ध होत होता. मात्र आज १०५ कोटी रूपये निधी जिल्ह्यात नियोजनासाठी उपलब्ध होत आहेत. जिल्ह्याच्या विकासात मी कुठेही कमी पडलो नाही. आपली डाळ शिजणार नाही. या भितीपोटी मला विरोधक विरोध करीत आहेत. विरोध करण्यापलिकडे त्यांचे एकतरी काम दाखवा. कोकणात माझ्यासमोर सक्षमपणे उभा राहणारा अन्य पक्षातील एकतरी नेता दाखवा. पुणे- मुंबईशी स्पर्धा करणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचा विकास मला करावयाचा आहे. जिल्हावासियांमुळेच मला अनेक पदे मिळाली. यापुढील काळात तुमच्या उपकाराचे ऋण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर समृद्ध जिल्हा म्हणून घडविण्याचा माझा संकल्प आहे, असे राणे म्हणाले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपाचा कट असल्याचेही ते म्हणाले. यावेळी संदेश पारकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, साईनाथ चव्हाण, बाळू कोळंबकर, संग्राम प्रभूगावकर, कृष्णनाथ तांडेल, सुहास हडकर, छोटू ठाकूर, पपन मेथर, गोपी पालव, सरोज परब, कांचन गावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) उद्योग परत आणा धास्तावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, असे वक्तव्य केले आहे. अरे काय बिशाद तुमची? आम्ही जिवंत असेपर्यंत महाराष्ट्रापासून मुंबई तोडू देणार नाही. एवढेच प्रेम असेल तर मुंबईतून पळविलेले उद्योग पूर्ववत महाराष्ट्रात आणा, अशी राणे यांनी टीका केली.