शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:34 IST

America Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यात समेट घडवून आणण्यात पाकिस्तानला सातत्याने अपयश येत आहे.

America Iran War: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धातून कोणताही देश माघार घ्यायला तयार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाला मुदतवाढ दिली आहे. तसेच इराणने करार करावा, यासाठी अमेरिकेने आग्रह धरला आहे. अमेरिका आणि इराण संघर्षात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. इस्लामाबादमध्ये झालेली पहिली शांतता बैठक निष्फळ ठरली असली तरी आता पुन्हा एकदा शांतता चर्चेसाठी बैठक व्हावी, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. यातच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या एका विधानामुळे भारत यात मध्यस्थी करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. 

पहिली शांतता चर्चा फिसकटल्यानंतर अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल घेण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. यानंतर अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदी केली. जोपर्यंत इराण करार करत नाही, तोपर्यंत ही नाकेबंदी सुरूच राहणार असल्याचे अमेरिकेने ठामपणे सांगितले. शांतता बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमेरिका तयार आहे, परंतु, इराणने अद्याप तशी तयारी दर्शवली नाही. दोन्ही देशात समेट घडावा, यासाठी पाकिस्तानचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण, त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. यातच राजनाथ सिंह यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. 

भारत आपली भूमिका बजावून यशस्वी होऊ शकेल

पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेबाबत एक मोठे विधान समोर आले आहे. जर्मनीमध्ये असलेले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत सध्याच्या परिस्थितीत थेट मध्यस्थी करत नसला, तरी भविष्यात तशी शक्यता नाकारता येत नाही. भारताने आपल्या बाजूने प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. तुम्हाला माहिती आहे की, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. कदाचित भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा भारत आपली भूमिका बजावेल आणि यशस्वीही होऊ शकेल, असे सूचक विधान राजनाथ सिंह यांनी केले आहे. राजनैतिक बाबींबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन नेहमीच संतुलन आणि संवादावर आधारित राहिला आहे. भारताने सातत्याने युद्धाचा अंत आणि शांतता प्रस्थापित व्हावी, यावर भर दिला आहे, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

दरम्यान, राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात संवाद घडवून आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. एखादा तिसरा देश हस्तक्षेप करून ही परिस्थिती हाताळू शकतो का, याकडे जगाचे लक्ष लागले असल्याचे म्हटले जात आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan fails; India to mediate US-Iran talks? World watches!

Web Summary : Pakistan's mediation between the US and Iran falters. Rajnath Singh hints at India's potential role in future peace talks, emphasizing dialogue and peace. The world is watching if a third country can successfully intervene.
टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहGermanyजर्मनीUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान