शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

न्याहरी योजनेकडे अधिका-यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 30, 2014 00:16 IST

राज्यात ४0 कोटीची उलाढाल; मात्र पर्यटन महामंडळाच्या योजनेपासून लोणार वंचित

लोणार (बुलडाणा) : पर्यटन केंद्राचा विकास करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांमध्ये न्याहरी योजनेचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गंत राज्यात दरवर्षी जवळपास ४0 कोटीची उलाढाल होते; मात्र लोणार पर्यटनस्थळाकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ येथील पर्यटकांना मिळत नसल्याचे दिसून येते.राज्यातील वाढत्या पर्यटनामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यात अनेक ठिकाणी पर्यटन केंद्रे विकसीत करून, त्या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटक संकुलेही उभारण्यात आली. यासोबतच पर्यटकांना तेथील संस्कृती, कला, चालीरिती, परंपरा, राहणीमान याची माहिती व्हावी, पर्यटकांना वातावरणानुसार जेवणाची सुविधा व्हावी, या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने पर्यटन क्षेत्राच्या परिसरात बंद असलेली घरे संबंधित घरमालकामार्फत पर्यटकांना उपलब्ध करून देऊन, पर्यटकांची गरज पूर्ण करण्यासाठी राज्य पर्यटन महामंडळाने निवास व न्याहरी योजना कार्यान्वित केली. १0 वर्षापूर्वीच्या या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी ४0 कोटीची उलाढाल होते. पर्यटकांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा पाहिजे त्या प्रमाणात प्रसार न झाल्यामुळे लोणारसारखे जागतिक किर्तीचे पर्यटन स्थळ या योजनेपासून वंचित आहे. राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून, यात सातारा जिल्हा क्रमांक १ वर आहे. कोकणातही या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना पर्यटनस्थळाशी अनुरूप भोजनाचा स्वाद स्थानिक नागरिकांच्या घरी जावून घेता यावा, यासाठी राज्य पर्यटन महामंडळाकडून न्याहरी निवास योजना कार्यान्वित करण्यात आली. दिवसेंदिवस पर्यटनाकडे वाढत चाललेला ओढा लक्षात घेता, पर्यटकांना विनासायास आणि रूचकर भोजन मिळावे, यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली; परंतु पर्यटन महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून या योजनेचा पाहिजे त्याप्रमाणात प्रसार न झाल्यामुळे या योजनेच्या लाभापासून जाग ितक किर्तीचे पर्यटनस्थळ असलेले लोणार वंचित आहे. लोणार हे राज्यातील एक महत्वपूर्ण पर्यटनस्थळ असून, येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी पर्यटनाशी संबंधित प्र त्येक योजना इथे राबविली गेली पाहिजे, जेणे करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे लोणार येथील महाराष्ट्र पर्यटन संकुलाचे संचालक राजेश मापारीयांनी संचालक, महाराष्ट्र पर्यटन संकुल, लोणार