शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वाहनांना ब्रेक!

By admin | Updated: January 26, 2015 00:58 IST

नागपुरात वर्ष २०१२मध्ये ७० हजाराने वाहनांची संख्या वाढली. या वाढत्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण झाली होती, परंतु २०१३ पासून नव्या वाहनांच्या विक्रीवर ब्रेक लागला आहे.

२०१३ वर्षीच्या तुलनेत -९.०७ टक्के फरक : औद्योगिक विकास खुंटल्याचा परिणामसुमेध वाघमारे - नागपूरनागपुरात वर्ष २०१२मध्ये ७० हजाराने वाहनांची संख्या वाढली. या वाढत्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण झाली होती, परंतु २०१३ पासून नव्या वाहनांच्या विक्रीवर ब्रेक लागला आहे. परिणामी २०१३च्या तुलनेत मागील वर्षी उणे ९.०७ टक्के फरक पडला आहे. सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती आणि औद्योगिक विकास खुंटल्याने याचा फटका वाहन विक्रीवर झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दुचाकी, आॅटोरिक्षा, टॅक्सी, कार, ट्रक, टेम्पो आणि बस आदी वाहनांची संख्या २०१२ मध्ये झपाट्याने वाढली. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूककोंडी, पार्किंगची समस्या निर्माण झाली. वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याच्या समस्येला नागपूरकर सामोरे जात असतानाच प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या वाहनांच्या तुलनेत ५ हजार १५८ वाहनांची नोंद कमी झाली. २०१२ मध्ये नव्या ४९ हजार ९५ वाहनांची खरेदी झाली, २०१३ मध्ये यात ४३ हजार ८६० तर २०१४ मध्ये ३८ हजार ७०२ खरेदी झाली.दुचाकींची संख्या ४ हजार ९२१ने घटलीनागपुरात एकूण १४ लाख ९ हजार ७७८ वाहने आहेत. यात १२ लाख ६९ हजार ८२९ दुचाकी आहेत. २०१२ मध्ये ४१ हजार २४९ नव्या दुचाकींची नोंद झाली होती, या तुलनेत २०१३ मध्ये ३७ हजार ८६२ तर २०१४ मध्ये ३२ हजार ९४१ वाहनांची नोंद झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९२१ने घट आली आहे. मागील वर्षी फक्त ५ हजार ७६१ नव्या कारशासकीय कर्मचाऱ्यांसह अनेक कंपन्यांचे खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाल्याने २०१२ पर्यंत दुचाकीएवेजी चारचाकी खरेदीकडे अनेकांचा कल होता. मात्र २०१३ पासून ही संख्या कमी होत गेली, ती मागील वर्षांपर्यंत कायम होती. २०१२ मध्ये ७ हजार ८४६ नव्या कार्सची नोंद झाली. २०१३ मध्ये ५ हजार ९९८ तर २०१४ मध्ये ५ हजार ७६१ कारची नोंद झाली. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत २३७ कारची संख्या कमी झाली आहे. रस्ते अपघातही घटलेनव्या वाहनांची कमी झालेली संख्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागील वर्षीपासून व्यापक प्रमाणात केलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृतीमुळे मागील वर्षीच्या तुलनेत नागपुरातील अपघातांच्या प्रमाणात ११६ ने घट झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत मृतांचा आकडा वाढला आहे. २०१३ मध्ये १२६५ अपघात झाले. यात २५५ जणांचा मृत्यू झाला तर २०१४ मध्ये ११४९ अपघात झाले असून यात २६३ जणांचा मृत्यू झाला.