शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळ तोट्यात

By admin | Updated: August 20, 2014 01:08 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्या १० वर्षांपासून तोट्यात आहे. वार्षिक तीन ते पाच कोटींचा तोटा आहे. मिहानप्रमाणे विमानतळाला नवसंजीवनी देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे.

राज्य सरकार अपयशी : वार्षिक तीन ते पाच कोटींचा तोटावसीम कुरेशी - नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्या १० वर्षांपासून तोट्यात आहे. वार्षिक तीन ते पाच कोटींचा तोटा आहे. मिहानप्रमाणे विमानतळाला नवसंजीवनी देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) संयुक्त कंपनी मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) विमानतळाचे संचालन करते. पुढे संचालनासाठी या कंपनीला अद्याप कुणी भागीदार मिळाला नाही, हे विशेष.२०१०-११ मध्ये एमआयएलला जवळपास ३० कोटींचे उत्पन्न झाले. २०१२-१३ मध्ये जवळपास ३४ कोटी आणि २०१३-१४ मध्ये ३५ कोटींचे उत्पन्न मिळाले. उपरोक्त वर्षांमध्ये कंपनीला वार्षिक तीन ते पाच कोटींचा तोटा झाला आहे. एटीसी उत्पन्नात कमकुवत४९ टक्के भागीदारी असलेल्या एएआयला नागपुरातून उड्डाण भरणाऱ्या प्रत्येक विमानावर दरदिवशी ३० हजार रुपये हवाई वाहतूक मार्गाद्वारे मिळतात. शेड्यूलव्यतिरिक्त नॉनशेड्यूल विमानांद्वारे एएआयला यावर्षी एकूण ७.२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दोन वर्षांत नेव्हिगेशन व एअर ट्रॅफिक कन्ट्रोल सर्व्हिसेसला सर्वोत्तम बनविले आहे. हवाई मार्ग विश्वसनीय झाल्याचा फायदा मुंबई व दिल्ली विमानतळाला मिळाला आहे. या दोन्ही शहरांमध्ये विदेशी आणि देशाच्या अन्न शहरांतील विमानाची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. बहुतांश उड्डाणे टर्मिनेटिंग पॉर्इंट असल्याने या शहरांना नागपूर एटीसीच्या टप्प्यातील मार्गाच्या उपयोगाने जास्त उत्पन्न मिळते. हे उत्पन्न अखेर एएआयच्या खात्यात जाते. (प्रतिनिधी)वाय-फाय कनेक्टिव्हिटीचा अभावआंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा असतानाही हे विमानतळ अनेक बाबतीत मागे आहे. इंटरनेटसाठी वाय-फाय सुविधा नाही. काही दिवसांआधी एका खासगी कंपनीने नि:शुल्क सेवा देण्याची आॅफर दिली होती. यंत्रणाही बसविली, नंतर कंपनीने काढता पाय घेतला. प्रवाशांना काहीच दिवस कनेक्टिव्हिटी मिळाली. यासाठी जाहिरात करून कंपनीने आपला प्रचार केला. उत्पन्नाचा स्रोत एमआयएलला तोट्याचा ठरला. स्कायलॉर्कवर १० कोटी थकीतबैतूल (मध्य प्रदेश) येथील रहिवासी अनिवासी भारतीय सेम वर्मा यांचे ‘स्कायलॉर्क’ हे विमान २४ वर्षांपासून विमानतळावर तळ ठोकून आहे. सध्या ते अत्यंत खराब झाले आहे. आधी एएआय आणि हस्तांतरणानंतर एमआयएलला एकूण १० कोटी वसूल करायचे आहे. या रकमेत व्याज जोडले आहे. पूर्वी एएआयने या विमानाचे रूपांतर रेस्टॉरंटमध्ये करून उत्पन्नाचा विचार केला होता. मनपाने एरो पार्क प्रकल्पासाठी स्वावलंबीनगर येथे स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही प्रस्ताव थंडबस्त्यात गेले. या विमानाचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. धावपट्टीपासून सुमारे ९० मीटरवर हे विमान उभे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धावपट्टीपासून १५० मीटरपर्यंत कोणतीही वस्तू असे नये, असा नियम आहे.