शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पूल १६ सप्टेंबरपासून बंद

By admin | Updated: September 13, 2016 14:32 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वरील उल्हासनदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल तिसऱ्यांदा दुरुस्तीयोग्य झाल्याने तज्ज्ञांकडून त्याची तपासणी सुरु आहे.

ऑनलाइन लोकमत 

भाईंदर, दि. १३ -   मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वरील उल्हासनदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल तिसऱ्यांदा दुरुस्तीयोग्य झाल्याने तज्ज्ञांकडून त्याची तपासणी सुरु असून त्याचा  अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दुरुस्तीसाठी त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे एनएचएआय (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणान) कडून सांगण्यात आले आहे. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मात्र १६ पासूनच वाहतूक बंद करण्याचे आदेश जरी केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 

एनएचएआयने १९७३ मध्ये मुंबई ते गुजरातदरम्यानची वाहतूक जलद करण्यासाठी वसई-विरार व मीरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीवरून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दोन पदरी वाहतूक पूल बांधला. १९ वर्षांतच या पुलाच्या दुरुस्तीने डोके वर काढले. १९९२-९३ मध्ये दुरुस्तीसाठी हा पूल दोन महिने  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये याच पुलाच्या एका गर्डरला तडा गेल्याची बाब उघडकीस आल्याने तो दुरुस्तीसाठी तब्बल दिड वर्षे त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. यानंतरही या पुलाच्या पडझडीला सुरुवात झाल्याने ऑगस्टमध्ये महाड येथील पुलाच्या दुर्घटनेमुळे त्याची दुरुस्तीसुद्धा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने ५ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानंतर ४ सप्टेंबरपासून एनएचएआयच्या निर्देशानुसार आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) व एनएचएआयच्या तज्ज्ञांकडून ४३ वर्षीय व १९९५ मध्ये लागतच बांधलेल्या नवीन वाहतूक पुलांची तपासणी सुरु झाली. त्यावेळी जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, गणेशोत्सव काळात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने गणेशोत्सवानंतर दुरुस्ती सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी माहिती जिल्हा प्रशासनासह वाहतूक विभाग व स्थानिक पोलिसाना देण्यात आली. यानुसार जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी १६ सेप्टेंबरपासून जुना वाहतूक पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. तत्पूर्वी वाहतूक विभागाने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करुन  हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवली आहे. परंतु, हा पूल नेमक्या कोणत्या  तारखेपासून वाहतुकीसाठी बंद करायचा त्यासाठी तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतिक्षा करण्यात येत आहे. या  पूलाच्या दुरुस्तीसाठी १५  दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याला सुमारे ६ महिन्यांचा कालावधी  लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत एनएचएआयचे  व्यवस्थापक  दिनेश अग्रवाल म्हणाले, वाहतूक मंत्रालय, आयआरबी व एनएचएआयसाच्या तज्ज्ञांकडून  अद्याप पुलाची तपासणी सुरु असून त्याचा अहवाल १५ सेप्टेंबरपर्यंत प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. अहवालातील सूचनेनुसारच दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेऊन त्या पुलावरील वाहतूक  पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 
 
जुन्या पुलाच्या दुरुस्तीनंतर लगतच्या पुलाची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येथील  वाहतूक कोंडी वर्षभर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुरुस्तीदरम्यान ठाणे येथून गुजरातकडे जाणारी वाहतूक माजिवडा जंकशन, माणकोली नाका, अंजूर फाटा, चिंचोटी मार्गे महामार्ग क्रमांक ८ वर वळविण्यात येणार आहे. तर मुंबईहून गुजरातकडे जाणारी व मुंबईकडे येणारी दोन्ही बाजूंकडील वाहतूक नवीन पुलावरून सुमारे १५ ते २० मिनिटांच्या थांब्याने सोडण्यात येणार आहे.