शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

लोकांना जेवण देताय की भिक; 'शिवभोजना'वरून मनसेची ठाकरे सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:29 AM

अशा योजनामुळे 'भिक नको पण कुत्रा आवर' असे लोकं काही दिवसात म्हणतील असे म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकाराला खोचक टोला लगावला.

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात 10 रुपयात गरजूंना जेवण देणार असल्याचे आश्वासन दिले होते. तर सरकार स्थापन होताच ठाकरे यांनी 'शिवभोजन' योजनेची घोषणा केली आहे. तर या 'शिवभोजन' योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच विरोधकांकडून ही फसवी योजना असल्याचा आरोप केला जात आहे.

भाजपनंतर आता महराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही 'शिवभोजन' योजनेवरून सरकारवर टीका करण्यात आली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सराकार लोकांना 10 रुपयात थाळी देऊन उपकार करत नाही. 10 रुपयासाठी किती अटी लावणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

अशा योजनामुळे 'भिक नको पण कुत्रा आवर' असे लोकं काही दिवसात म्हणतील असे म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकाराला खोचक टोला लगावला. सरकाराला देता येत नसेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे की, 10 रुपयात थाळी देता येणार नाही. मात्र त्यासाठी अटी-शर्ती लावून फसवणूक कशाला करता असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, 'बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे, तितकीच त्यांची शिवभोजन योजना सुद्धा फसवी असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आणि माजी आमदार राम कदम यांनी केला आहे.