शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

इंग्रजी शाळांमधल्या मराठीची चिंता जिल्हाधिकारी असताना केली का? शिक्षणमंत्र्यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 7:00 AM

 ‘‘जिल्हाधिकारी असताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी यातला एकही निर्णय राबविला नव्हता. मग आता हे एकदम का सुरू झाले आहे?

ठळक मुद्देअनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी विषय बंधनकारक

नम्रता फडणीसपुणे : ‘‘ माजी संंमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख जिल्हाधिकारी होते त्यावेळी त्यांनी इंग्रजी शाळांमध्येमराठी शिकविले जात होते की नव्हते, हे पाहिले होते का?,’’ असा सवाल राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. मराठी संदर्भात गेल्या पावणेपाच वर्षात ज्या गोष्टी झाल्या, त्यापूर्वी कधीच झाल्या नव्हत्या. देशमुख आणि डॉ. श्रीपाद जोशी यांना त्या दिसत नाही का, असाही प्रश्न तावडे यांनी उपस्थित केला आहे.      लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्यासह अनेक साहित्यिकांनी भाषा विकास प्राधिकरण कायदा करणार का? पाच हजार मराठी शाळा बंद करण्याचे लक्ष्य रद्द करणार का? मराठी माध्यमांच्या बंद पाडलेल्या शाळा पुन्हा सुरू करून त्यांचा दर्जा सुधारणार का?  शाळांचे खाजगीकरण होऊ देणार नाही असे म्हणणार का?  मराठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी लेखी आश्वासित केलेली अशासकीय तज्ञांची उच्चाधिकार समिती केंव्हा नेमणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी  ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी देशमुख आणि डॉ. जोशी यांच्यावरच तोफ डागली. ‘‘जिल्हाधिकारी असताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी यातला एकही निर्णय राबविला नव्हता. मग आता हे एकदम का सुरू झाले आहे?  तिथे त्यांनी इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविले जात होते की नव्हते? हे पाहिले होते का? तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी काँग्रेसच्या काळात हे मुद्दे का काढले नाहीत,’’ असे तावडे म्हणाले. आज एसएससी बोर्डाच्या मराठी व इंग्रजी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी विषय बंधनकारक आहे. मात्र काही सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय दुस-या क्रमांकाची भाषा म्हणून शिकविला जातो किंवा पर्यायी भाषा म्हणून वापरण्यात येतो. त्यावर विनोद तावडे म्हणाले, की सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या इंग्रजी शाळांमध्ये देखील आठवीपर्यंत मराठी विषय सक्तीचा आहे. त्याची जर अमंलबजावणी होत नसेल तर शाळांवर कडक कारवाई केली जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील मागणीने साहित्यवर्तुळात जोर धरला आहे. त्यावर भाष्य करताना अभिजात भाषेच्या दर्जा मिळण्याबाबतची सगळी तयारी करून अहवाल केंद्रीय कँबिनेटला दिला आहे. लवकरच त्यासंबंधी काहीतरी निर्णय होईल अशी आशा तावडे यांनी व्यक्त केली. ..............भाषा प्राधिकरणाची गरज नाही    ‘‘आठवीनंतर शाळांमध्ये मराठी भाषा ठेवायची की जर्मन, रशियन, फ्रेंच भाषा विद्याथर््यांना द्यायच्या यावर विचार सुरू आहे. कारण मराठी मुलांचे जागतिक करिअर बंद करायचे की पुढे चालू ठेवायचे  याचा निर्णय शिक्षणतज्ञ बसून घेत आहेत. हा निर्णय राजकीय नसतो तर तो शिक्षण तज्ञांचा असतो. भाषा विकास प्राधिकरण कायदा वगैरे करण्याची गरज नाही. तर मराठी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सरकार अधिक मजबूत प्रयत्न करीत आहे. - विनोद तावडे,शिक्षणमंत्री 

टॅग्स :PuneपुणेLaxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुखVinod Tawdeविनोद तावडेmarathiमराठीEducationशिक्षणSchoolशाळा