शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या चिंताजनक; हिंसा नको - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:30 IST

मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही. सध्याची परिस्थिती संवेदनशील आहे. आम्ही दखल घेतली आहे. त्यामुळे हिंसाचार व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन उच्च न्यायालयाने केले.मराठा आरक्षणाबाबत जलदगतीने निर्णय घेण्यासंदर्भात आर. आर. पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. न्यायालयाने मराठा समाजाला शांतता पाळण्याचे आवाहनही केले. ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आम्ही या स्थितीची दखल घेतली आहे. राज्य सरकार आणि मागासवर्ग आयोग कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत. समाजाने हे लक्षात घ्यावे. यापुढे आंदोलनकर्ते कायदा हातात घेणार नाहीत, यावर आमचा विश्वास आहे. आंदोलनासंबंधी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त आम्ही वाचले आहे. काही आंदोलकांनी केलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. आयुष्य मौल्यवान आहे आणि ते अशा रीतीने नष्ट करू नका,’ असे न्यायालयाने म्हटले.पाच संस्थांना कामछत्रपती शिवाजी प्रबोधिनी संस्था (औरंगाबाद), रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (मुंबई), शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (नागपूर), गुरुकृपा विकास संस्था (कल्याण) आणि गोखले इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स (पुणे) या पाच संस्थांमार्फत ३१ जुलैपर्यंत राज्यभरातून माहिती जमा झाली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या विविध विभागांकडूनही माहिती मिळाली आहे. सर्व प्रकारची माहिती, जुने न्यायनिवाडे, राज्यघटनेतील तरतुदी असा सर्व विचार करून आणि शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करून राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करू, असे आश्वासन आयोगाने दिले आहे, अशी माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर न्यायालयात सादर केली.>१५ नोव्हेंबरनंतर निर्णयमराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकार त्याविषयी निर्णय घेईल, अशी माहिती राज्य सरकारनेच मुंबई उच्च न्यायालयात आज दिली.>आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंतमराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही, याबाबतचा अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारला देऊ, असे आश्वासन न्या. एम. व्ही. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाने दिल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी न्यायालयात दिली. त्यावर मागासवर्ग आयोगाने लवकरात लवकर अहवाल देण्याचा प्रयत्न करावा आणि १० सप्टेंबर रोजी प्रगती अहवाल सादर सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.परळीतील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित केल्याची घोषणा मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, नागपूर, पुणे येथे क्रांती दिनी आंदोलन होणार आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण