शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या चिंताजनक; हिंसा नको - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:30 IST

मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही. सध्याची परिस्थिती संवेदनशील आहे. आम्ही दखल घेतली आहे. त्यामुळे हिंसाचार व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन उच्च न्यायालयाने केले.मराठा आरक्षणाबाबत जलदगतीने निर्णय घेण्यासंदर्भात आर. आर. पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. न्यायालयाने मराठा समाजाला शांतता पाळण्याचे आवाहनही केले. ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आम्ही या स्थितीची दखल घेतली आहे. राज्य सरकार आणि मागासवर्ग आयोग कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत. समाजाने हे लक्षात घ्यावे. यापुढे आंदोलनकर्ते कायदा हातात घेणार नाहीत, यावर आमचा विश्वास आहे. आंदोलनासंबंधी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त आम्ही वाचले आहे. काही आंदोलकांनी केलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. आयुष्य मौल्यवान आहे आणि ते अशा रीतीने नष्ट करू नका,’ असे न्यायालयाने म्हटले.पाच संस्थांना कामछत्रपती शिवाजी प्रबोधिनी संस्था (औरंगाबाद), रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (मुंबई), शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (नागपूर), गुरुकृपा विकास संस्था (कल्याण) आणि गोखले इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स (पुणे) या पाच संस्थांमार्फत ३१ जुलैपर्यंत राज्यभरातून माहिती जमा झाली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या विविध विभागांकडूनही माहिती मिळाली आहे. सर्व प्रकारची माहिती, जुने न्यायनिवाडे, राज्यघटनेतील तरतुदी असा सर्व विचार करून आणि शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करून राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करू, असे आश्वासन आयोगाने दिले आहे, अशी माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर न्यायालयात सादर केली.>१५ नोव्हेंबरनंतर निर्णयमराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकार त्याविषयी निर्णय घेईल, अशी माहिती राज्य सरकारनेच मुंबई उच्च न्यायालयात आज दिली.>आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंतमराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही, याबाबतचा अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारला देऊ, असे आश्वासन न्या. एम. व्ही. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाने दिल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी न्यायालयात दिली. त्यावर मागासवर्ग आयोगाने लवकरात लवकर अहवाल देण्याचा प्रयत्न करावा आणि १० सप्टेंबर रोजी प्रगती अहवाल सादर सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.परळीतील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित केल्याची घोषणा मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, नागपूर, पुणे येथे क्रांती दिनी आंदोलन होणार आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण