शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनास अखेर परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 3:07 AM

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाला चार दिवसांनंतर पोलिसांनी तोंडी परवानगी दिली असली, तरी अद्याप राज्य सरकारकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी व्यक्त केली आहे.डोंगरे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि शासकीय नोकरी देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र आत्महत्यांना चार महिने उलटल्यानंतरही संबंधित कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळालेली नाही. याउलट मदतीसाठी आंदोलन करणाऱ्या कुटुंबीयांना परवानगी नाकारण्यात येत होती. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. याशिवाय गेल्या चार दिवसांपासून सरकारने मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केल्याने मराठा समाजातील रोष वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याआधी सरकारने सर्व मागण्या मान्य करण्याचे आवाहन डोंगरे यांनी केले.समन्वयक नानासाहेब जावळे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची गरज आहे. अन्यथा आरक्षण टिकणार नाही. सरकारकडून दोन समाजांत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तूर्तास मराठा क्रांती ठोक मोर्चाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लवकरच ठोक मोर्चा आपल्या पद्धतीने आंदोलनास सुरुवात करेल. त्यानंतर सर्व जबाबदारी सरकारची असेल.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण