शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरमध्ये अनेक मावळे झाले बाशिंगवीर

By admin | Updated: May 26, 2014 02:24 IST

लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे आणि कल्याण या दोनही मतदारसंघात उत्तम कामगिरी बजावणारे शिवसेनेचे दोन मावळे नरेश म्हस्के व गोपाळ लांडगे या दोघांमध्ये या उमेदवारीसाठी चुरस असल्याचे बोलले जाते.

ठाणे : शिवसेनेचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राजन विचारे हे खासदार झाल्यामुळे चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना येथून कुणाला उमेदवारी देणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तर लोकसभा निवडणुकीत बजावलेल्या कामगिरीच्या आधारे शिवसेनेतील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. २००९च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारासंघ शिवसेनेच्या वाट्याला होता. व त्यात राजन विचारे हे दणदणीत बहुमताने विजयी झाले होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार अशी चिन्हे होती. परंतु अचानक ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली गेली व ते खासदारही झालेत. त्यामुळे आता त्यांची रिक्त झालेली जागा कोण घेणार? असा प्रश्न शिवसेनेत चर्चिला जातो आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे आणि कल्याण या दोनही मतदारसंघात उत्तम कामगिरी बजावणारे शिवसेनेचे दोन मावळे नरेश म्हस्के व गोपाळ लांडगे या दोघांमध्ये या उमेदवारीसाठी चुरस असल्याचे बोलले जाते. तर कोळी समाजाला महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातून अनंत तरे यांचाही या मतदारसंघासाठी विचार होऊ शकतो असे ‘मातोश्रीं’च्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. तर एक विचारप्रवाह असा आहे की, तरे यांना विधान परिषदेवर पाठवावे व म्हस्के अथवा लांडगे यापैकी एकाला येथे उमेदवारी देऊन त्यांच्या निष्ठेचे व कार्याचे चिज करावे. तर दुसरा विचार प्रवाह असा आहे की, लांडगे आणि म्हस्के यांना महापालिकेच्याच राजकारणात सक्रिय ठेवून तरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला विधानसभा गाजविण्याची संधी द्यावी. ती दिल्यास राज्यातील कोळी समाजाची मते शिवसेना आणि युतीच्या पाठीशी एकवटतील व त्याचा फायदा संपूर्ण राज्यात मिळेल. ठाणे महापालिकेच्या निवडणुकाही लवकरच होणार असल्याने ती ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने काही अनुभवी नेत्यांनी ठाण्यातच राहणे योग्य ठरणार आहे. महापालिकेचा गड राखण्यासाठी व सांभाळण्यासाठी म्हस्के व लांडगे यांना ठाण्यातच ठेवावे व त्यांना तिथे महत्त्वाची पदे द्यावीत व तरेंना आमदारकीची उमेदवारी द्यावी. या मतदारसंघावर अनिता बिर्जे, माजी महापौर अशोक वैती, विद्यमान महापौर हरिश्चंद्र पाटील यांनीही दावा ठोकला आहे. यापैकी वैती हे मतदारसंघा बाहेरचे असून त्यांचा आवाका ‘मातोश्री’ला कमी वाटतो आहे. तर हरिश्चंद्र पाटील शिवसेनेत इम्पोर्ट झालेले आहेत. बिर्जे यांनी नगरसेविकेपलीकडे झेप घेतलेली नाही. अशा स्थितीत तरे यांचा अनुभव आणि निष्ठा लक्षात घेता त्यांची दावेदारी प्रभावी असल्याची चर्चा शिवसेनेत आहे. (विशेष प्रतिनिधी)