शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीड: 'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:44 IST

Manoj Jarange Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी असमाधान व्यक्त केले. त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते, अशी भूमिका मांडली.  

Manoj Jarange on Eknath Shinde Devendra fadnavis: "सरकार आपल्यासोबत असून आपल्याला न्याय नाही म्हटल्यावर... सोबत नसतं तर ठीक आहे की, आंदोलन करावं लागेल. पण, यापेक्षा कोणते संवेदनशील प्रकरण हवंय सरकारला? अशा वेळेला ते शिंदे साहेबच पाहिजे होते", असे मोठे विधान मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी मस्साजोग येथे केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 

एकनाथ शिंदेंबद्दल बोलताना फडणवीसांवर निशाणा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. "अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे होते. त्यांनी खपाखप तुरुंगात टाकले असते. तंगड्या धरून आपटले असते. ही काय तिरस्कारासारखी वागणूक आहे. देशमुख कुटुंबाला उपोषणाला बसावं लागतंय म्हणजे तिरस्काराची वागणूक आहे."

"मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला की नाही? आजही देताहेत. तुम्हाला एकदाही माया दया फुटत नाही. सरकारसोबत असून न्याय नाहीये", असे मनोज जरांगे म्हणाले. 

एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, जरांगेंनी काय दिले उत्तर?

तुम्ही म्हणालात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते, तर तुरुंगात टाकलं असतं. पण, ते सरकारमध्ये आहेत? असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. 

या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, "अरे बाबा, मुख्यमंत्री होते, तेव्हाच चालू दिलं नाही, आता उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चालू द्यायचं. तेव्हा कामं झाली नाहीत. आमच्या दोन मागण्यांना आता दोन महिने होतील. मराठा आरक्षणाच्या. आठ मागण्या होत्या. म्हणाले, चार करतो. चारपैकी आता दोन वर आलेत. त्याही पूर्ण होईना. कुणाचाच कुणाला मेळ नाही. यातून लक्षात येतं की, गरिबांचा सरकारला किती तिरस्कार आहे", असे उत्तर मनोज जरांगेंनी दिले. 

एकनाथ शिंदे भेटीला आले नाहीत?

देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला एकनाथ शिंदे आले नाहीत, असा प्रश्नही जरांगेंना विचारण्यात आला. ते म्हणाले, "ते आले. नाही आले. तो त्यांचा विषय आहे. ते मला माहिती नाही. बाकीचे कुणीच येऊन गेले नाहीत, त्यांचं काय? फडणवीस पण आले नाहीत. देशमुख कुटुंबीयांनी काय हेलिकॉप्टर लावायचं होतं का? इकडे काय मुसळधार पाऊस होता, इकडचे सगळे पूल वाहून गेले होते? मी बरोबरी करत नाही, मी फरक सांगतोय. फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदे लय चांगले, असं नाही. आम्ही दोघांच्या कामातील फरक सांगतोय", असे मनोज जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीSantosh Deshmukhसंतोष देशमुख