शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कुपोषणामुळे शून्य ते १४ वयोगटात सर्वाधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 6:00 AM

‘इंडिया : हेल्थ आॅफ नेशन स्टेट’चा अहवाल : १५ ते ३९ वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू हिंसाचार आणि आत्महत्येमुळे

मुंबई : कुपोषणावरील उपाय महत्त्वाचे आहेतच, पण त्याला आळा घालण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ‘इंडिया : हेल्थ आॅफ नेशन स्टेट’च्या अहवालानुसार राज्यात कुपोषणामुळे शून्य ते १४ वयोगटातील सर्वाधिक मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण ४५.४ टक्के आहे. याखालोखाल अतिसार, श्वसनविकार या कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

गर्भधारणेपासून ते मूल दोन वर्षांचे होईपर्यंतचा हजार दिवसांचा काळ हा मुलांच्या मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात पुरेसे पोषण मिळाल्यास मूल भविष्यात एक निरोगी आयुष्य जगू शकते व पिढ्यान्पिढ्या चालू असलेले गरिबीचे चक्र भेदण्याच्या कामी त्याचा हातभार लागण्याची शक्यता वाढते. गर्भामध्ये व बाल्यावस्थेमध्ये होणाऱ्या कुपोषणाकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश सरदेसाई यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, या अहवालानुसार १५ ते ३९ वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण हिंसाचार आणि आत्महत्या आहे. याचे प्रमाण १६.२ असून त्याखालोखाल १३.९ टक्के तरुणाई कर्करोगामुळे मृत्यू पावते, असे निरीक्षण मांडले आहे.

याविषयी मानसोपचारतज्ज्ञडॉ. सुनंदा शाह यांनी सांगितले की, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार तरुण पिढीला होत आहेत. त्यात स्पर्धात्मक युगामुळे ताणतणावातही भर पडतेय. दिवसभर काबाडकष्ट करूनदेखील तुमच्या हातात काहीच पडत नसेल तर ही गोष्ट कोणाला सांगता येत नाही. आपल्याला कोणी याबाबत मदतही करू शकणार नाही, अशी भावना मनात तयार होत असल्याने तणावग्रस्त होऊन लोक स्वत:चे जीवन संपवतात. मात्र याला आळा घालण्यासाठी संवाद, सकारात्मक वातावरण, आवडीचा छंद अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण करण्याची अधिक गरज आहे.महिला-पुरुषांमध्ये लोहाची कमतरताअहवालानुसार, महिला व पुरुषांमध्ये लोहाची कमतरता कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर ऐकणे-दृष्टीची क्षमता हरविणे, पाठीचे दुखणे आणि मायग्रेन अशा समस्या अधिकाधिक उद्भवत असल्याचे निरीक्षण मांडले आहे. याखेरीज, वैद्यकीय तज्ज्ञांनी सामान्यांनी आरोग्याकडे अधिकाधिक गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू