शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महाराष्ट्रात साखरेचे भाव शरद पवार यांनीच पाडले

By admin | Published: November 20, 2014 11:37 AM

अहमदनगर जिल्ह्यातील काळे, कोल्हेंसह सगळे कारखानदार काटामार, उताराचोर आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केला.

 महाराष्ट्रात साखरेचे भाव शरद पवार यांनीच पाडले

 
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील काळे, कोल्हेंसह सगळे कारखानदार काटामार, उताराचोर आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केला.
संघटनेच्या वतीने आयोजित ऊस व दूध परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूरच्या साखर कारखान्यांचा जादा उतारा निघत असताना अहमदनगर जिल्ह्याचा साखर उतारा १२ टक्क्यांपेक्षा कमी कसा? असा सवाल करून ते म्हणाले, या जिल्ह्यातील सर्वच कारखानदार उतारा चोरतात, काटा मारतात. यात काळे, कोल्हेंसह सगळेच सामील आहेत. १ टक्के उतारा चोरणे म्हणजे १0 किलो साखर चोरणे. त्यामुळे टनामागे २७0 रूपये चोरी करुन ते कारखानदारांच्या घरात जातात.
सरकारचा कर बुडवला जातो. सरकार व शेतकर्‍यांची फसवणूक करुन बिनशिक्क्यांचे पोते बाजारात विकून तो पैसा निवडणुकीत वापरला जातो. एकाच काट्यावर साखर, ऊस व रिकाम्या तसेच भरलेल्या ट्रकचे वजन होत नाही, हेच यामागचे इंगित आहे. ही चोरी थांबविण्यासाठी आपल्या प्रयत्नातून देशभरात खासदार निधीतून सहकारी साखर कारखान्यांसमोर इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसविण्यास सुरुवात झाली आहे. आता आमचे सरकार आल्यामुळे आमदार निधीही यासाठी देण्याची मागणी आहे. जो आमदार त्यासाठी निधी देणार नाही, तो काटामारांना सामील असल्याचे समजण्यात येईल. नगर जिल्ह्यातील उतारा चोरी थांबल्यास १२.५0 टक्क्यांपेक्षा जास्त उतारा मिळून शेतकर्‍यांनाही जादा भाव मिळेल. 
यंदाच्या हंगामासाठी १५ दिवसात विनाकपात पहिली उचल २७00 रूपये प्रतिटन मिळाली पाहिजे. ही आमची मागणी नियमाप्रमाणे आहे. या मागणीसाठी २५ नोव्हेंबरला पुण्यातील साखर आयुक्तालयावर शेतकर्‍यांचा आसूड मोर्चा नेला जाणार आहे. पूर्वीचे सरकार ऐकत नव्हते.
आताचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला हा मोर्चा काढावा लागणार नसल्याचे सांगून चर्चेसाठी लगेचच हात पुढे केला आहे. राज्यात २0 टक्के दूध भेसळ करणारे राजकारणी आहेत. त्यांच्या मुसक्या बांधल्यास शेतकर्‍याच्या दुधाला योग्य भाव मिळेल. शरद पवारांनी अलिबागच्या शिबिरात माझ्या दूध संस्थेचा विषय काढला. माझ्या संस्थेचे दररोज ७0 हजार लीटर संकलन असून प्रति लीटर २३.५0 रूपये दर देत आहे. पवारांनी सहकारी साखर कारखान्यांचा परवाना मिळणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली आहे, अन्यथा त्यांना कारखानाही काढून दाखवला असता', असे आव्हानही त्यांनी पवारांनादिले. 
चंद्रकांत उंडे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी प्रास्ताविक केले. माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, प्रकाश देठे, प्रभावती घोगरे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांची भाषणे झाली. माजी आमदार दौलतराव पवार, हेरंब औटी, गुलाबराव डेरे आदी यावेळी हजर होते. (प्रतिनिधी) 
 
■ राज्यातील कारखानदारांनी एम.आर. पी. पेक्षा कमी भाव दिल्यास त्यांना बेड्या घालू. शेतकर्‍यांचे प्रश्न हे सरकार सोडवणार नसेल, तर त्यांनाही माफ करणार नाही. प्रसंगी ५ वर्षे रस्त्यावर राहू. ऊसप्रश्नी सरकारला २५ पर्यंत मुदत दिली आहे. साखरेच्या सट्टाबाजारांशी शरद पवारांचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनीच मुद्दाम साखरेचे भाव पाडले. आता उसाला भाव मिळत नाही म्हणून भाजपा सरकारला बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. 
- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना. भाव पवारांनीच पाडले