शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लुचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात; देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 06:00 IST

देशात २०१० ते २०१९ या दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे ११ हजार जणांचा स्वाईन फ्लुमुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देराष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राच्या जवळपासही नाही अन्य राज्यदहा वर्षांमध्ये सुमारे २९ हजार जणांना स्वाईन फ्लुची लागणमहाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक मृत्यू गुजरातमध्ये सुमारे १९०० एवढे

राजानंद मोरे - पुणे : आरोग्यविषयक सुविधांबाबत देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात स्वाईन फ्लुचे (एच  १एन १) सर्वाधिक बळी गेल्याचे आकडेवारी समोर आली आहे. देशात २०१० ते २०१९ या दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे ११ हजार जणांचा स्वाईन फ्लुमुळे मृत्यू झाला. त्यामध्ये सुमारे साडे तीन हजार जण महाराष्ट्रातील होते. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रा (एनसीडीसी)च्या या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राच्या जवळपासही अन्य राज्य नाही. नवी दिल्ली येथील ‘एनसीडीसी’च्या इंटिग्रेटेड डिसिज सर्व्हिलन्स प्रोग्रॅमअंतर्गत सेंट्रल सर्व्हिलन्स युनिटकडून सर्व राज्य व केंंद्रशासित प्रदेशांची स्वाईन फ्लुची आकडेवारी संकलित केली जाते. ‘एनसीडीसी’च्या संकेतस्थळावर २०१० पासूनची आकडेवारी देण्यात आली आहे. देशात आॅगस्ट २००९ मध्ये स्वाईन फ्लुचा पहिला रुग्ण पुण्यात दगावला होता. त्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग आली. सर्व राज्यांतील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. रुग्णालयांबाहेर सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्यामध्ये पहिला मृत्यू झाल्याने विशेष दक्षता घेण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत स्वाईन फ्लुच्या विषाणुने महाराष्ट्राची पाठ सोडलेली नाही.  ‘एनसीडीसी’च्या आकडेवारीनुसार, २०१० मध्ये देशात स्वाईन फ्लुमुळे १७६३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये ६६९ रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील होते. २०१५ हे वर्ष महाराष्ट्रासाठी सर्वाधिक बाधा देणारे वर्ष ठरले. यावर्षी ८ हजार ५८३ जणांना स्वाईन फ्लुची लागण झाली होती. त्यापैकी ९०५ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर २०१७ मध्ये ७७८, २०१८ मध्ये ४६१ तर मागील वर्षी २४६ जणांचा मृत्यू झाला. मागील दहा वर्षांमध्ये सुमारे २९ हजार जणांना स्वाईन फ्लुची लागण झाली. हा आकडा इतर कोणत्याही राज्याच्या जवळपासही नाही.--------------

दहा वर्षात ३४१७ जणांचा मृत्यूमागील दहा वर्षात महाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक मृत्यू गुजरातमध्ये सुमारे १९०० एवढे झाले आहेत. तर त्याखालोखाल राजस्थानमध्ये १६०० जणांचा बळी गेला. त्यानंतर कर्नाटक (५२०), उत्तर प्रदेश (२८०), आंध्रप्रदेश (१८४), तामिळनाडू (१६६), दिल्ली (१६५) या राज्यांचा क्रमांक लागतो...............

 * महाराष्ट्रातील २०१० पासूनची स्वाईन फ्लुची स्थिती -वर्ष                        बाधित                               मृत्यू२०१०                     ६,८१४                               ६६९२०११                       २६                                   ५२०१२                   १,५५१                                १३५    २०१३                     ६४३                                 १४९२०१४                    ११५                                  ४३    २०१५                   ८,५८३                               ९०५२०१६                     ८२                                  २६    २०१७                   ६,१४४                              ७७८    २०१८                   २,५९३                              ४६१२०१९                  २,२८७                              २४६२०२०                      २२                    ०० (दि. २ फेब्रु.पर्यंत)------------------------------------एकुण              २८,८६०                             ३,४१७------------------------------------देशाची स्वाईन फ्लुची स्थिती (२०१०-१९)वर्ष          स्वाईन फ्लुची लागण                  मृत्यू२०१०        २०,६०४                                    १,७६३२०११        ६०३                                            ७५२०१२        ५,०४४                                         ४०५२०१३        ५,२५३                                         ६९९२०१४        ९३७                                            २१८२०१५       ४२,५९२                                       २,९९१२०१६        १७,८६                                        २६३२०१७    ३८,८११                                         २,२७०२०१८        १५,२६६                                     १,१२८२०१९        २८,७९८                                     १,२१८----------(स्त्रोत : एनसीडीसी, नवी दिल्ली)

टॅग्स :PuneपुणेSwine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्यDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल