शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

असा एक तरी सर्व्हे दाखवा ज्यात...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जमिनीवरची परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 20:00 IST

विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 

मुंबई - भाजपाचा सर्व्हे मला माहिती नाही; पण जगाला, देशाला, पत्रकारांना माहिती पडतो. हा सर्व्हे कोणता..? मला असा एक तरी सर्व्हे दाखवा त्यात काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला इतक्या जागा मिळतील असं दाखवलं आहे. भाजपाच्या सर्व्हेत पक्षाला संतोषजनक वातावरण आहे. प्रत्येक सर्व्हेत आम्हाला आमच्या जागा वाढलेल्या दिसताहेत. कुठेही नकरात्मक सर्व्हे नाही. अतिशय पॉझिटिव्ह सर्व्हे असून विजयाकडे घेऊन जाणारा हा सर्व्हे आहे, असं विधान भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि सहयोगी संपादक यदु जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेवेळी अपेक्षाकृत आमच्या लोकांची नाराजी जास्त होती. आम्ही अजितदादांना सोबत घेतले तेव्हा इतकी नाराजी असेल वाटलं नव्हतं. परंतु आज तशी परिस्थिती नाही. बेरजेचे राजकारण काय आहे हे आम्ही आमच्या मतदारांना, संघटनांना समजावू शकलो आहोत. त्यामुळे ८० टक्के मनाने, २० टक्के शिस्तीने मतदार आमच्यासोबत आहेत. अजितदादा सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धीविनायकला जातात. जेव्हा आम्ही हिंदुत्व मांडतो तेव्हा ते कधी प्रतिवाद करत नाहीत. अजितदादा आमच्याकडे आल्याने त्यांच्यात परिवर्तन होतंय हे दिसून येतं. ही निवडणूक चुरशीची असेल. विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रत्येकाला आपापला पक्ष आहे, त्यामुळे जास्त जागा मिळाव्यात असा आग्रह असतो. कार्यकर्त्यांचाही असतो. महाविकास आघाडीशी तुलना करता आम्ही सामंजस्याने जागावाटप केले. पहिल्या २ चर्चांमध्ये आमचं २४० जागांचं वाटप झालं होतं. ४८ जागांपैकी ३८ जागांवर तिसऱ्या चर्चेत तोडगा निघाला. १० जागांवर निश्चितपणे आम्हाला त्रास झाला. शेवटी त्याचा निकालही आम्ही लावला आहे. महायुतीत आम्हाला १६०-१६५ जागांची अपेक्षा होती. परंतु १५२ जागा मिळाल्या. महायुतीत तीन पक्ष लढत असताना १५२ जागा मिळणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे, असं फडणवीसांनी नमूद केलं. 

५० वर्षं राम मंदिराचं स्वप्न उराशी बाळगून आम्ही एक दिवस हे स्वप्न पूर्ण करू शकतो अशा ताकदीने काम करायचे. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा राम मंदिर उभं राहिले. त्यामुळे शत प्रतिशत भाजपा एका दिवसात होऊ शकत नाही. लोकांचा विश्वास आम्हाला अधिक कमवावा लागेल. आज महाराष्ट्रात जे काही युतीचे राजकारण आहे त्याला पर्याय नाही. भाजपाची ताकद आहे, पण केवळ ताकदीवर निवडून येऊ शकतो का तर असं नाही. आम्हाला मित्रांची गरज आहे. त्यामुळे आम्ही मित्रांसोबत लढतोय असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. 

भाजपा तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करतं, परंतु...

राजकारणात अनेकांना वाटतं, ही निवडणूक आपण लढलो नाही तर ही जीवनातील अंतिम निवडणूक आहे असं वाटते. अलीकडच्या काळात राजकीय कार्यकर्ते थांबण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे पक्षातून लोक जातात. सगळ्याच पक्षातून जात असतात पण सरसकट असं होत नाही. आज आमच्या पक्षात अनेकांनी अर्ज भरले, ते माघारी घेताहेत. भाजपात जे तत्त्व आम्ही सांगतो, ते पाळतोही. सत्तेचं राजकारण असल्याने जितकं जास्त असेल तितकं तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करतो असं फडणवीसांनी म्हटलं. 

शरद पवारांमधील परिवर्तन स्वागतार्ह 

राजकारणाची जी दिशा मोदींनी बदलली, राजकीय नेते ईश्वराचे भक्त होते, धार्मिक होते पण ते लपून लपून करायचे. मंदिरात गेल्यावर पुरोगामी प्रतिमा खराब होतेय असं त्यांना वाटायचे. मोदींमुळे ते नेते मंदिरात उघड जाऊ लागले. वारीत जाणार, मंदिरात जाणार हे शरद पवारांचे परिवर्तन स्वागतार्ह आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

पाहा व्हिडिओ

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती