शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सोडणाऱ्यांची यादी मोठी; पण काहींनाच झाला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:40 IST

अण्णा डांगे, अण्णा जोशी ते गुडधे...अनेकांनी केला रामराम

यदु जोशीमुंबई : १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यापासून बऱ्याच नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. मात्र, पक्षांतर करून त्यांना नव्या पक्षात मोठे यश वा पद मिळाल्याची उदाहरणे कमीच आहेत. पक्षातील विशिष्ट नेत्यांबाबत नाराजी व्यक्त करून बाहेर पडणे हे आजचे नाही. यापूर्वीही तसे घडलेले आहे.पक्षांतर्गत गटबाजी, कुरघोडीचे राजकारण, काही नेत्यांना डावलले जाणे याबाबत पक्षात बरेचदा धुसफूस झाली, पण बंडाचे निशाण हाती घेत पक्षाबाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या कमीच राहिली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर, आजवरच्या काही प्रमुख भाजप नेत्यांच्या पक्षांतराचा पट समोर आला.युती सरकारच्या काळात ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री राहिलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत लोकराज्य हा पक्ष स्थापन केला पण तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. पुढे डांगे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादीने त्यांना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी नेमले होते. मात्र, त्यांना आमदारकी वा मंत्रिपद मिळू शकले नाही.नगरसेवक ते खासदार असा प्रवास करणारे पुण्यातील निष्ठावंत नेते अण्णा जोशी हे भाजपने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज झाले आणि पुढे राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतर्फे त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढली, पण ते पराभूत झाले होते. बीडचे खासदार राहिलेले जयसिंगराव गायकवाड हे एकेकाळी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती मानले जात, पण पुढे दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले आणि गायकवाड यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. पण काही वर्षांनी मुंडेंच्या हाकेला ओ देत ते भाजपमध्ये परतले. भाजपच्या आमदार राहिलेल्या विमल मुंदडा (केज, जि. बीड) पुढे राष्ट्रवादीत गेल्या आणि मंत्रीही झाल्या. आता त्यांच्या सूनबाई नमिता मुंदडा याच मतदारसंघात भाजपच्या आमदार आहेत.

गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी या दोन दिग्गज नेत्यांच्या वादात मुंडे बंडाचे निशाण फडकवितात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण लालकृष्ण आडवाणींसह त्यावेळच्या दिग्गज नेत्यांनी ते वादळ शमविले. मुंडे यांचे सख्खे पुतणे धनंजय यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीची वाट धरली; आज ते मंत्री आहेत. विदर्भातील ज्येष्ठ नेते प्रा.महादेवराव शिवणकर हे एकेकाळी पक्षात मोठे नाव होते. मात्र, पुढे ते पक्षात डावलले गेले. त्यांचे पुत्र विजय हे राष्ट्रवादीत गेले. त्यांनी गेल्या वर्षी तिरोडा मतदारसंघातून (जि.गोंदिया) विधानसभेची निवडणूक लढविली पण ते पराभूत झाले. महादेवराव शिवणकर आता राजकारणात पूर्वीसारखे सक्रिय नाहीत. भाजपचे आमदार, खासदार राहिलेले आणि पक्षसंघटनेत दीर्घकाळ विविध पदांवर राहिलेले भंडारा जिल्ह्यातील नेते डॉ.खुशाल बोपचे यांनीही पक्ष सोडला होता, ते राष्ट्रवादीत गेले आणि पुन्हा परतून भाजपचे आमदार झाले व पुढे पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र रविकांत (राष्ट्रवादी) यांचा तिरोडा मतदारसंघात पराभव झाला.रा.स्व. संघाची स्थापना जेथे झाली त्या नागपूर शहरात भाजपचा पहिला आमदार निवडून येण्यासाठी १९९०पर्यंत वाट पाहावी लागली. पहिले आमदार होते, विनोदगुडधे पाटील. ते १९९५ मध्येही जिंकले पण पुढे पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांचे पुत्र प्रफुल्ल गुडधे काँग्रेसकडून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येतात. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचे बोट धरून विनोद गुडधे पाटील राजकारणात आले होते. प्रफुल्ल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढविली होती. संघ-जनसंघ-भाजप असा प्रवास केलेले मुंबईतील निष्ठावंत नेते मधु देवळेकर यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली होती. भाजपमध्येही काँग्रेसप्रमाणेच गटबाजी फोफावली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. महाराष्ट्र भाजपच्या संस्थापकांपैकी एक असलेले प्रा.सूर्यभान वहाडणे काही वर्षे पक्षात नाराज होते पण त्यांनी पक्ष सोडला नाही.शिर्डी येथे त्यांनी बोलाविलेल्या भाजपमधील मराठा नेत्यांच्या बैठकीची मोठी चर्चा त्यावेळी झाली होती. युती सरकारच्या काळात सार्वजनिक आरोग्य मंत्री राहिलेले डॉ. दौलतराव आहेर हे पुढे राष्ट्रवादीत गेले पण पुन्हा भाजपत परतले. आज त्यांचे पुत्र राहुल हे चांदवडचे (जि. नाशिक) भाजप आमदार आहेत.

माझ्यावर दबाव नाही - रक्षा खडसेएकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणारआहेत. खडसेंच्या निर्णयावर त्या म्हणाल्या, आजचा दिवस अत्यंत दु:खाचा आहे. बाबांनी जो निर्णय घेतला त्याचं दु:ख मलाही आहे. पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मी भाजपकडून निवडून आली आहे. त्यामुळे मी पक्षाचे काम करणार आहे. नाथाभाऊंनी कधीही माझ्यावर मी सांगेन तेच करायचे असा दबाव टाकला नाही, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.

भाजपला आत्मचिंतन करावे लागेल : सुधीर मुनगंटीवार

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडला हे धक्कादायकच आहे. पक्षासाठी निश्चितपणे चिंतनाची बाब आहे असे मला व्यक्तिगतरीत्या वाटते. ४० वर्षे त्यांनी पक्षाची सेवा केली. सच्चा राष्ट्रवादाकडून बुरखा घातलेल्या राष्ट्रवादीत ते जात आहेत. कोणत्या का असेना पण नाराजीतून ते जात आहेत हे चिंतन करण्यासारखे आहे. पक्षासाठी त्यांचे योगदान मोठेच होते, अशा शब्दांत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भावना व्यक्त केली.

ओ जानेवाले हो सके तो लौट के आनाहै कौन वहा तेरा सभी लोग है परायेपरदेस की गर्दीश मे तू खो न जाएकाँटो भरी डगर है तु दामन बचानाए जानेवाले हो सके तो लौट के आना

अशा शब्दांत मुनंगटीवार यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना परतीसाठी साद घातली खरी पण तोवर खडसेंनी परतीचे दोर कापलेले होते. शेवटी, ‘खुश रहे तु सदा ये दुवा है मेरी’ अशी सदिच्छा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :BJPभाजपाeknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस