शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ एमआयडीसीत भूखंडवाटप घोटाळा

By admin | Updated: September 22, 2015 01:43 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) यवतमाळातील भूखंडवाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे.

यवतमाळ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) यवतमाळातील भूखंडवाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. गरजूंना वंचित ठेवून आधीच भूखंड लाटलेल्यांना केवळ दलालांच्या इशाऱ्यावर पुन्हा भूखंड दिले गेले आहेत.पश्चिम विदर्भात विमानतळ, रेल्वे, महामार्ग या दळणवळणाच्या सोयी नसल्याने उद्योजकांनी पाठ फिरविली आहे. त्यातच कुणी लहान-मोठा उद्योग थाटण्यासाठी तयार झाला तर त्याला एमआयडीसीची यंत्रणा साथ देण्यास तयार नाही. यवतमाळ एमआयडीसीमध्ये यापूर्वीच मोठ्या प्रमाणात भूखंडवाटप झाले आहे. एका-एका व्यक्तीकडे पाच ते सात भूखंड आहेत. गेल्या १०-१५ वर्षांपासून त्यांनी हे भूखंड आपल्या ताब्यात ठेवले आहेत. मात्र एवढ्या वर्षांत त्यावर एकही उद्योग उभारलेला नाही. आजच्या घडीला या भूखंडांवर जणू जंगल तयार झाले आहे. काहींनी केवळ दाखविण्यासाठी या भूखंडाला कम्पाउंड घालून तेथे एक-दोन खोल्यांचे बांधकाम केले आहे. त्याद्वारे अनुदान लाटले गेले आहे. आजच्या घडीला यवतमाळ एमआयडीसीतील ७० टक्के भूखंड पडून आहेत. नियमानुसार उद्योग सुरू न केल्यास पाच वर्षांत हे भूखंड एमआयडीसीने परत घेणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी असलेल्या ‘सलोख्या’च्या संबंधांमुळे अनेक भूखंड परत घेतले गेले नाही. भूखंड बळकावून बसलेल्यांना केवळ नोटीस बजावून कारवाईचा देखावा निर्माण केला जात आहे.नियमानुसार जुने भूखंड ताब्यात घेऊन नव्या उद्योजकांना देणे अपेक्षित आहे. मात्र उद्योग थाटण्यासाठी भूखंडाची मागणी करणाऱ्यांना कोणत्याही सोयीसुविधा नसलेल्या नवीन एमआयडीसीत पाठविले जाते. त्यासाठी आणखी २४५ एकर जमीन संपादित केली आहे. त्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे.यवतमाळच्या जुन्या एमआयडीसीमधील शिल्लक असलेले भूखंड अमरावतीच्या अधिकाऱ्यांनी खास आपल्या मर्जीतील व्यक्तींसाठी जणू राखीव ठेवले आहे. अकोला येथील विरवाणी व वर्धा येथील कुकरेजा हे दोन दलाल पश्चिम विदर्भातील एमआयडीसी कार्यालयांमध्ये सक्रिय आहेत. या दलालांमार्फत भूखंडांचे वाटप केले जाते. औद्योगिक भूखंडांसाठी या दलालांच्या समाजबांधवांच्या उड्या पडत आहेत. त्यासाठी ते प्रति एकर ३ लाख रुपये ‘मार्जीन’ ठेवून भूखंड खरेदी करीत आहेत. या दलालांच्या माध्यमातून बीअर बार, रेस्टॉरेन्टसाठी पाच ते सात एकर जागा दिली गेली आहे.याच कारणांसाठी आधी जागा घेतलेली असताना काहींनी त्यात वाढ करून घेतली आहे. मात्र अद्याप त्यांचे एमआयडीसीसोबत करार न झाल्याने त्यांची नावे रेकॉर्डवर आलेली नाहीत. या माध्यमातून यवतमाळ एमआयडीसीत उद्योजकांऐवजी दारू विक्रेते, मटका किंग यांची ‘एन्ट्री’ झाली आहे.हे दोनही दलाल एमआयडीसीतील डेप्युटी सीईओ गोविंद बोडखे (मुंबई) यांच्या मर्जीतील असल्याचे सांगितले जाते. त्यांनीच भूखंडवाटपात घोळ घातल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)