शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 08:31 IST

महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधु हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे. या घटनेवरून भाजपाने मविआ सरकारविरोधात आरोपांचं रान उठवले होते.

डहाणू- महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांड प्रचंड गाजले. या घटनेवरून भाजपाने राज्यभरात रान उठवले होते. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याची सुरुवात याच घटनेपासून सुरू झाली होती. या घटनेत भाजपाने ज्यांच्यावर गंभीर आरोप केलेत, त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते काशिनाथ चौधरी यांना मोठ्या दिमाखात भाजपाने प्रवेश दिला आहे. डहाणूत भाजपाविरोधात सर्व पक्ष एकत्र आलेले असताना भाजपाने काशिनाथ चौधरींचा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. मात्र या पक्षप्रवेशावरून भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

डहाणूत शिंदेसेना, अजित पवार गट, उद्धवसेना, शरद पवार गट एकीकडे भाजपाविरोधात एकत्र आलेले आहेत. त्यातच दुसरीकडे शरद पवार गटाचे काशिनाश चौधरी यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत डहाणू तालुक्यातील कासा, सायवन, कळमादेवी, मोडगाव, खुबाले, रायपूर, उधवा, हळदपाडा यासह शेजारील तलासरीचे तालुकाध्यक्ष संजू वराठा यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपाचे खासदार डॉ. हेमंत सावरा, आ.हरिशचंद्र भोये, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह इतर नेते होते.

काय आहे पालघर साधू हत्याकांड?

महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधु हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे. या घटनेवरून भाजपाने मविआ सरकारविरोधात आरोपांचं रान उठवले होते. लॉकडाऊन काळात पालघर जिल्ह्यात साधू चिनमयानंद आणि सुधाम महाराज यांच्यासह त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कार्यकाळात ही घटना घडल्याने भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरले होते. या घटनेतील मुख्य सूत्रधार काशिनाथ चौधरी आहेत असा आरोप भाजपाने केला होता. मात्र याच काशिनाथ चौधरींना भाजपाने पक्षप्रवेश दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

१६ एप्रिल २०२० रोजी घडलेल्या या घटनेत भाजपा नेत्यांनी चौधरी यांना प्रमुख दोषी ठरवले होते. एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारविरोधात जे बंड केले त्याचे हे प्रमुख कारण सांगण्यात आले. जमावाच्या हल्ल्यात २ साधू आणि एका वाहन चालकाची हत्या झाली होती. त्यात पोलिसांनी २०० लोकांना ताब्यात घेतले, १०८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. काशिनाथ चौधरी त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते, तेव्हा भाजपाने या घटनेमागील मुख्य सूत्रधार तेच असल्याचा आरोप केला होता. मात्र आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर चौधरी यांना भाजपाने पक्षात घेत कमळ हाती दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी भाजपावर तोंडसुख घेतले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP inducts Palghar murder accused, sparking controversy and questions.

Web Summary : BJP welcomed Kashinath Choudhary, previously accused in the Palghar साधू murder case, raising eyebrows. Despite past accusations and opposition unity, BJP's move faces criticism ahead of local elections.
टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे