शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शरद पवार यांना वारंवार 'मातोश्री'वर हेलपाटे मारायची वेळ आणणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 18:49 IST

शरद पवार यांच्या वयाचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते... 

ठळक मुद्देजनतेच्या हितासाठी आम्ही सरकारबरोबर काम करायला तयार आहोत. 

पुणे : प्रणव मुखर्जीं यांना राष्ट्रपती करायचे होते तेव्हा २००४ साली सोनिया गांधी यांनी सांगितल्यामुळे, शिवसेनेची मते मागायला शरद पवार मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर थेट आत्ता व गेल्या आठवड्यात तर दोन-तीन वेळा पवार मातोश्रीवर गेले आहेत. हे काही बरोबर नसून या वयात त्यांचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते. वारंवार पवार यांना मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लक्ष केले़ 

    पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, उध्दव ठाकरे पंढरपूरसाठी बाहेर पडले तर मध्ये एकदा बांद्रा व गोरेगाव येथील तात्पुरत्या उभारलेल्या कोविड सेंटरच्या पाहण्यासाठीच गेले. या व्यतिरिक्त ते घराबाहेर निघालेले दिसत नाही. एकवेळ घराबाहेर नाही पडले तरी चालेल, पण मातोश्रीवरही ते कोणाला भेटायला तयार नाही. तसेच व्हीसीवर चर्चा केली म्हणून घरात बसून चालणार नाही़ व असेच करीत राहिला तर हे सरकार चालणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी, प्रशासनावर तुमचा धाक नसणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.     जनतेच्या हितासाठी आम्ही सरकारबरोबर काम करायला तयार आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दररोज दोन तास जरी बरोबर घेऊन काम केले असते तर कोरोना विरोधात आणखी प्रभावी काम झाले असते. परंतु, उध्दव ठाकरे कोरोनाविरोधातील कामकाजात कोणाचाही सहभाग घेण्यास तयार नाहीत असेही पाटील म्हणाले. -----------------मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका आवश्यक सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर स्टे आला तर तो उठविणे खूप कठीण जाईल. राज्य सरकार आरक्षण टिकविण्यासाठी काही करत नाही असे आमचे म्हणणे नाही. परंतु, मराठा समाजाला यापूर्वीच मागास आयोगाने मागस म्हणून घोषित केले आहे़ तसेच ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षणाचा मुद्दाही उच्च न्यायालयात गाह्य धरला. गेल्या असल्याची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडून, राज्य सरकारने आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका यापुढे घेतली पाहिजे. सारथी, आण्णासाहेब पाटील महामंडळ, मराठा आरक्षण या गोष्टी राजकारणाच्या वर असून, या समाजाच्या हितासाठी आम्ही राज्य सरकारबरोबर काम करण्यास तयार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.    दरम्यान, राज्य सरकारने ज्या ६०५ अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क देण्यात येत होते. ते यंदाच्या शैक्षणिक वर्षात ओबीसी तून की उच्च शिक्षण योजनेतून देणार हे जाहिर करावे़ तसेच सारथीकडून देण्यात येणारी स्कॉलरशिप व फेलोशिपही चालू करून, महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या व्यावसायिक कर्जाचे वाटप वाढवून, १० लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी अधिकाधिक तरूणांना द्यावे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊत