शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेचे प्रमाण वाढले, वेतनही वाढवा हो!

By admin | Updated: July 6, 2014 00:42 IST

विधी सल्लागारांच्या येण्याने पोलिसांना कायदेशीर ज्ञानाचे बळ मिळाले, त्यांची दोषारोपपत्रे बिनचूक जाऊ लागली, पर्यायाने खटल्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढले. परंतु त्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विधी

विधी सल्लागारांचा टाहो : राज्यात साडेतीनशेवर पदे रिक्तराजेश निस्ताने - यवतमाळविधी सल्लागारांच्या येण्याने पोलिसांना कायदेशीर ज्ञानाचे बळ मिळाले, त्यांची दोषारोपपत्रे बिनचूक जाऊ लागली, पर्यायाने खटल्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढले. परंतु त्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विधी सल्लागारांचे वेतन मात्र आठ वर्षांपासून जैसे थेच आहे. सत्र न्यायालय आणि प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाऱ्या फौजदारी खटल्यात शिक्षेचे प्रमाण दहा वर्षांपूर्वी नगण्य होते. पोलिसांची सदोष दोषारोपपत्रे, सरकारी पक्ष-पोलीस-पंच साक्षीदारांमध्ये समन्वयाचा अभाव आदी बाबी त्यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या. म्हणून सन २००६ पासून विधी सल्लागार आणि विधी निर्देशक ही दोन पदे निर्माण करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात विधी सल्लागार तर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विधी निर्देशक बसविले गेले. कोणत्याही गुन्ह्याचे दोषारोपपत्र या विधी अधिकाऱ्यांच्या नजरे खालून जाऊ लागले. त्यातील चुका दुरुस्त होऊ लागल्या. त्याचा चांगला परिणाम न्यायालयीन खटल्यातील शिक्षेच्या प्रमाणावर दिसू लागला. न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढण्यासोबतच फिर्यादी पक्षाला न्याय मिळावा यासाठी विधी सल्लागार झटताना दिसतात. परंतु आता या सल्लागारांवरच अन्याय होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. गेल्या आठ वर्षांपासून या सल्लागारांच्या वेतनात शासनाने एक रुपयाचीही वाढ केलेली नाही. सर्वत्र विनवण्या करूनही या सल्लागारांचा ना पगार वाढला ना कायम नियुक्ती मिळाली. पर्यायाने अनेक सल्लागार हे पद सोडून निघून गेले. राज्यात विधी सल्लागारांची ४७१ पदे मंजूर आहेत. आजच्या घडीला त्यातील केवळ शंभर-सव्वाशे पदे भरलेली आहेत. उर्वरित साडेतीनशेवर पदे रिक्त आहे. त्यात नागपूर, औरंगाबाद परिक्षेत्रात सर्वाधिक आहेत. ‘नियमित करा अथवा पगारवाढ द्या’ या मागण्यांना शासन प्रतिसाद देत नसल्याचे पाहून काही विधी सल्लागारांनी ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) धाव घेतली. तेथे या सल्लागारांच्या बाजूने निकाल लागला. म्हणून शासनाने ‘मॅट’च्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथेही ‘मॅट’चा निकाल उचलून धरताना विधी सल्लागारांना दिलासा दिला गेला. आता शासनाने त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना शासनाने विधी सल्लागारांना नियमित करण्यासंबंधी सध्या कोणतेही धोरण नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले. तर दुसरीकडे सेवा प्रवेश नियमावली तयार करून त्यात सलग पाच वर्षे सेवा झालेल्या व्यक्तीला कायम नियुक्ती देता येईल, अशी तरतूद केली. या प्रकरणात आता १ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमच्या परिश्रमामुळे खटल्यातील शिक्षेचे प्रमाण वाढले असताना आमच्या वेतनात वाढ का नाही, हा राज्यातील तमाम विधी सल्लागारांचा एकमुखी सवाल आहे.