शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

"मी 84 आमदारांना निलंबित केलेलं"; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:48 IST

Harshvardhan Patil indapur vidhan sabha: हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी राजकीय भाष्य करतानाच एक जुना किस्साही सांगितला.

Harshvardhan Patil News: काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते हर्षवर्धन पाटील पुन्हा दुसऱ्या पक्षात उडी मारणार अशा चर्चा आहेत. हर्षवर्धन पाटील त्याबद्दल सूचक संकेत देताना दिसत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत इंदापूर निवडणुकीबद्दल भाष्य केले. त्याचबरोबर ८४ आमदारांच्या निलंबनाचा एक किस्साही सांगितला. 

हर्षवर्धन पाटील यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी अजित पवारांसोबतचे राजकीय वैर आणि अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक आल्यानंतरच्या आठवणी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितल्या.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, "राजकारण हे समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न असतो. मला असे वाटते की लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. तो आपला सगळ्याच पक्षांशी असतो. राहिलाच पाहिजे. जेव्हा राजकीय मते व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाची आपली भूमिका ठरलेली असते."

'माझ्यावर अन्याय झाला की, इंदापूरची जनता...'

"माझ्यावर त्यावेळी अन्याय झाला. ज्या-ज्या वेळी माझ्यावर अन्याय होतो, त्यावेळी माझ्या तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहते, हा मला अभिमान आहे. मला वयाच्या ३१ व्या वर्षी इंदापूरच्या जनतेने आमदार केले. आमदारकीची शपथ घेण्याअगोदर मला राज्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा योग आला", अशी आठवण हर्षवर्धन पाटलांनी सांगितली.   

"मी त्या काळातील सर्वात तरुण मंत्री होतो. सलग चार वेळा म्हणजे १७-१८ वर्षे. पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मला खूप शिकता आले. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख... या सगळ्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर अतिशय सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध मी प्रस्थापित केले. मी राजकारणात कायम अॅसेट म्हणून काम केले", असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

हर्षवर्धन पाटलांना का म्हणायचे निलंबन मंत्री?

"मला असे वाटते की तो काळ राजकारणाचा सुवर्णकाळ होता. धोरणात्मक निर्णय व्हायचे. मी संसदीय कार्यमंत्री होतो. मला तर निलंबन मंत्री म्हणायचे. मी सभागृहात एन्ट्री केली की, म्हणायचे आले, निलंबन मंत्री. मी ८४ आमदारांना निलंबित केलेले १० वर्षाच्या काळात. त्यावेळी कटुपणा घ्यावा लागायचा. वाईटपणा घ्यावा लागायचा. आता मी ज्या पक्षात आहे, त्यातील काही लोकांना निलंबित करावे लागले", असा किस्सा हर्षवर्धन पाटील यांनी सांगितला.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रIndapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलAjit Pawarअजित पवारBJPभाजपा