शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर मोकाट कसे

By admin | Updated: August 19, 2014 01:01 IST

नागपूर आणि अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीची सरासरी ७८ टक्के प्रकरणे निर्दोष ठरून केवळ २२ टक्के प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. संपूर्ण राज्यातील शिक्षेचे प्रमाण २३ टक्के आहे.

रंगलेले हात होताहेत बेरंग : २२ टक्के प्रकरणात शिक्षानागपूर आणि अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीची सरासरी ७८ टक्के प्रकरणे निर्दोष ठरून केवळ २२ टक्के प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. संपूर्ण राज्यातील शिक्षेचे प्रमाण २३ टक्के आहे. राज्यातील विशेष न्यायालयात २००९ मध्ये एकूण ४६६ प्रकरणे निकाली लागून १०६ प्रकरणात शिक्षा आणि ३६० प्रकरणे निर्दोष सुटली. २०१० मध्ये ३५३ प्रकरणे निकाली लागून ६८ मध्ये शिक्षा होऊन २८५ प्रकरणे निर्दोष ठरली. २०११ मध्ये ३८३ प्रकरणांपैकी ९० प्रकरणांमध्ये शिक्षा होऊन २९३ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१२ मध्ये ४९४ प्रकरणांपैकी ११८ मध्ये शिक्षा होऊन ३७६ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१३ मध्ये ३८७ प्रकरणांपैकी ८० मध्ये शिक्षा होऊन ३०७ प्रकरणे निर्दोष ठरली. चालूवर्षी आतापर्यंत १५९ प्रकरणांपैकी ४६ मध्ये शिक्षा होऊन ११३ प्रकरणे निर्दोष ठरली. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि गोंदियाचा समावेश होणाऱ्या नागपूर परिक्षेत्रात २००९ मध्ये ८९ प्रकरणांपैकी २५ मध्ये शिक्षा होऊन ६४ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१० मध्ये ३८ प्रकरणांपैकी ६ मध्ये शिक्षा होऊन ३२ प्रकरणे निर्दोष ठरली. २०११ मध्ये ४८ प्रकरणांपैकी १३ मध्ये शिक्षा होऊन ३५ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१२ मध्ये ३९ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा होऊन ३२ प्रकरणे निर्दोष सुटली. २०१३ मध्ये ३५ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा होऊन २८ प्रकरणे निर्दोष ठरली. तर चालू वर्षी २०१४ मध्ये आतापर्यंत ३१ पैकी ७ मध्ये शिक्षा आणि २४ प्रकरणे निर्दोष ठरली. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिमचा समावेश होणाऱ्या अमरावती परिक्षेत्रात २००९ मध्ये ३३ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा होऊन २६ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१० मध्ये ३४ प्रकरणांपैकी ६ मध्ये शिक्षा होऊन २८ निर्दोष ठरले. २०११ मध्ये ३७ प्रकरणांपैकी ६ मध्ये शिक्षा होऊन ३१ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१२ मध्ये ६२ प्रकरणांपैकी १७ मध्ये शिक्षा होऊन ४५ निर्दोष ठरली. २०१३ मध्ये ४६ पैकी १५ मध्ये शिक्षा होऊन ३१ निर्दोष ठरली. चालू वर्षी आतापर्यंत १८ प्रकरणांपैकी ३ प्रकरणात शिक्षा होऊन १५ प्रकरणे निर्दोष ठरली. ३०२ प्रकरणे मंजुरीविना अडलीसंबंधित आरोपीविरुद्ध न्यायालयात लाचखोरीचा खटला दाखल करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शासनाची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी मोठा विलंब होतो. काही प्रकरणात मंजुरीच मिळत नसल्याने त्याचा फायदा आरोपीला मिळतो. मंजुरीस लागणाऱ्या विलंबाचा फायदाही आरोपीला होतो. शासनाकडे मंजुरीसाठी राज्यातीलच एकूण ३०२ प्रकरणे असून त्यापैकी १११ प्रकरणे ९० दिवसांच्या वरची तर १९१ प्रकरणे ९० दिवसांच्या खालची आहेत. या विलंबामुळे ही प्रकरणे न्यायालयांमध्ये दाखल होऊ शकली नाहीत. यात महसूल विभागाची ८३, गृह विभागाची ६९, नगर रचना, महानगरपालिकांची ३४, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींची ३० प्रकरणे आहेत.