शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

८९८ शाळांतील विद्यार्थ्यांचे भवितव्य लागले टांगणीला; अनेक शाळांना मान्यता नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 6:17 AM

मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर : २०१९ - २० च्या माहितीनुसार राज्यात ८९८ मान्यता नसलेल्या शाळा कार्यरत असून, या शाळा आरटीईच्या नियमांचे उल्लघन करीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे

सीमा महांगडेमुंबई : राज्यात सध्या मान्यता नसलेल्या एकूण ८९८ अनधिकृत शाळा असल्याचे वास्तव २०१९-२० च्या यूडायस प्लसच्या माहितीतून समोर आले. यामध्ये पहिली ते पाचवी इयत्तेच्या शाळांची संख्या सर्वाधिक आहे. मान्यता नसलेल्या सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर जिल्ह्यांत असल्याचेही उघडकीस आले आहे. यात इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक आहे.

राज्य सरकारतर्फे दरवर्षी शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील एकूण शिक्षणाची परिस्थिती जाणून घेण्याच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली म्हणजेच यूडायस प्लसकडे संकलित केली जाते. २०१९ - २० च्या माहितीनुसार राज्यात ८९८ मान्यता नसलेल्या शाळा कार्यरत असून, या शाळा आरटीईच्या नियमांचे उल्लघन करीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये पहिली ते बारावीच्या सर्व शैक्षणिक संस्थांचा समावेश असून, पहिली ते पाचवीच्या अनधिकृत शाळांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले.

एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूदशिक्षण हक्क कायद्यानुसार सरकारची अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता अथवा ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय शाळा चालविण्यात येत असेल, तर संबंधितांना एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची रक्कम व त्यानंतरही शाळा अनधिकृतरीत्या चालू राहिल्यास प्रतिदिन १० हजार रुपये दंड करण्याची तरतूद आहे. 

मुंबई उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, महापालिकांचे प्रशासन अधिकारी यांनी जिल्हास्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करून या शाळांची माहिती यूडायस प्लसमध्ये अद्ययावत करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प समन्वयक राजेंद्र पवार यांनी दिल्या आहेत. असे असूनही किती शाळांवर अशा प्रकारची कारवाई झाली आहे, याबद्दल शंकाच आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

मुंबई पालिका क्षेत्रात सर्वांत जास्त २३० शाळा अनधिकृतयूडायस प्लसच्या माहितीनुसार, राज्यात मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे २३० शाळा अनधिकृत आहेत. मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या क्षेत्रात १६ शाळा मान्यतेशिवाय कार्यरत आहेत. म्हणजेच मुंबई जिल्ह्यात एकूण २४६ शाळा अनधिकृत आहेत. त्याखालोखाल पालघर जिल्ह्यात १६० , ठाणे १६२, तर नागपूर जिल्ह्यात ८१ शाळा मान्यतेशिवाय सुरू आहेत. पुण्यात ४२, औरंगाबादमध्ये १९, रायगडमध्ये १२, नांदेडमध्ये १३, तर जळगावात ११ शाळा अनधिकृत आहेत.

टॅग्स :Schoolशाळा