शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीत आगपाखड

By admin | Updated: May 24, 2014 05:28 IST

पराभवाचे स्वतंत्रपणे चिंतन करीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतील मित्रपक्षांनी पराभवाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत परस्परांवर झोड उठविली आहे.

मुंबई : भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही झालेल्या पराभवाचे स्वतंत्रपणे चिंतन करीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतील मित्रपक्षांनी पराभवाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत परस्परांवर झोड उठविली आहे. शुक्रवारी दिवसभर आघाडीतील दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. बैठका-मेळाव्यांचा सिलसिला अखंड जारी होता. टिळक भवन येथे आज सलग दुस-या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत चिंतन बैठका झाल्या. यावेळी कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राणे यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या पराभवाला राष्ट्रवादीही जबाबदार असल्याचे सांगत राणे यांनी मित्रपक्षाला धारेवर धरले. त्यामुळे अंतर्गत धूसफूस, मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या अधिकार क्षेत्र, अशा वादात अडकलेल्या काँग्रेसच्या बैठकीचा नूरच सायंकाळी पालटला. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मनातील खदखद पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत व्यक्त केली. काँग्रेसने पवारांशी कधीही राजकीय चर्चा केली नाही, ज्यांनी घटक पक्षांची बाजू मांडायला हवी होती, ते डॉ. मनमोहन सिंग गेल्या दोन महिन्यांत दिसलेच नाहीत. संपुआवर टूजीपासून कोळसा पट्टे वाटपापर्यंत अनेक विषयात सातत्याने खोटे आरोप झाले, तरी डॉ. सिंग यांनी स्पष्ट शब्दांत बचाव केला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी) मागील खेपेस पर्याय नव्हता. पण आता चित्र बदलले आहे, असे सांगत पवारांनी जास्त जागांचा आग्रह रेटण्यास सुरुवात केली आहे. जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीला बदल हवा असेल तर त्यांनी काँग्रेसकडून कडून घेतलेल्या जागा परत कराव्यात, असा टोला राणे यांनी हाणला.