शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:29 IST

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या सहकार्याने विविध २४ अभ्यासक्रमांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनापासून या योजनेला सुरुवात होणार असून एकूण २ लाख ८८ हजार तरुण-तरुणींना याचा लाभ मिळणार आहे.

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या सहकार्याने विविध २४ अभ्यासक्रमांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनापासून या योजनेला सुरुवात होणार असून एकूण २ लाख ८८ हजार तरुण-तरुणींना याचा लाभ मिळणार आहे. सकल मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी हा निर्णय घेतला. याशिवाय आर्थिक मागासवर्ग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठीची उत्पन्न मर्यादा सहा लाखांवरून आठ लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात याबाबतची बैठक झाली. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने १८८ कोटींचा निधी दिला आहे. या योजनेतून सुमारे २ लाख ८८ हजार तरुण-तरुणींना विविध २४ अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य कौशल्य विकास सोसायट्यांच्या माध्यमातून येत्या २६ जानेवारीपासून प्रशिक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

आॅनलाइन प्रक्रिया
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील प्रस्तावांच्या कामांना गती देण्याचे निर्देश देऊन महसूलमंत्री पाटील म्हणाले, स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून दिल्या जाणाºया वैयक्तिक व गट कर्जावरील व्याजमाफी योजनेसाठी प्रजासत्ताक दिनापासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
तसेच इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच आर्थिक मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा (क्रिमीलेयर) सहा लाखांवरून आठ लाख करण्यासही उपसमितीने मंजुरी दिली. मराठा समाजाला दिल्या जाणाºया विविध सोयीसवलतींसाठीच्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीचा मार्ग सुकर झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbaiमुंबई