शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही मूल्यांसाठी दिला लढा

By admin | Updated: August 22, 2014 23:56 IST

कन्नड साहित्यात बहुमोल योगदान असलेले ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांचे शुक्रवारी निधन झाले.

पुणो : आपल्या प्रतिभासंपन्न साहित्यकृतीने जीवनातील वास्तवाचे दर्शन घडविणारे आणि कन्नड साहित्यात बहुमोल योगदान असलेले ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांना वाहिलेली शब्दरूपी श्रद्धांजली. 
 
मी अनंतमूर्ती यांच्याबरोबर कधी काम केले नाही. त्या अर्थाने त्यांच्याशी संबंध आला नव्हता; मात्र मी त्यांना अनेकदा भेटलो आहे. ज्यांच्याबद्दल कमालीचा आदर वाटावा असे ते होते. ते प्रतिभाशाली लेखक तर होतेच; पण आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेला एक महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे होता, तो म्हणजे लोकशाही मूल्यांसाठी कणखरपणो, ताठपणो कितीही विरोध असताना उभे राहणो. त्यांच्या या गुणामुळे आपल्यासारख्या माणसांना सतत स्फूर्ती मिळत राहिली. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने एक पर्व संपले, अशी भावना मनात येत आहे. त्यांच्यामुळे जे काही मिळाले ते विसरता कामा नये, असे मनापासून वाटते. ज्या ज्या वेळी लोकशाही मूल्यांसाठी उभे राहायची गरज भासेल, तेव्हा अनंतमूर्तीची उणीव भासेलच, पण ते आपल्याला प्रेरणाही देत राहतील.
- अमोल पालेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते
 
सुरुवातीला आमचा परिचय फक्त पत्रव्यवहारापुरता होता. नंतर मात्र गाठीभेटी होत गेल्या. आमच्या घरीही ते एक-दोनदा येऊन गेले आहेत. त्यांच्या तीन कादंब:या मराठीत अनुवादित झाल्या. त्यापैकी दोन कादंब:यांचा आणि एका कथासंग्रहाचा अनुवाद मला करायला मिळाला. माङया अनुवादाबद्दल ते समाधानी होते आणि त्यांच्यासारख्या मोठय़ा लेखकाचे साहित्य मला अनुवादित करता आले, याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.
अनंतमूर्ती हे समाजवादी विचारसरणीचे होते. त्यांच्यावर लोहियांचा प्रभाव होता आणि त्यांनी तो कधीही नाकारला नाही. तो प्रभाव त्यांच्या लेखनातूनही व्यक्त व्हायचा. ते स्वत: अतिशय कर्मठ वातावरणात वाढले होते. त्यांच्या ‘संस्कार’, ‘घटश्रद्ध’मध्ये जे वातावरण दिसते, ते त्यांनी अगदी जवळून अनुभवले होते. मात्र, त्यांनी ते वातावरण वापरले ते आपले आधुनिक विचार मांडण्यासाठी. गिरीश कार्नाड, गिरीश कासारवल्ली यांच्यासारख्या दिग्दर्शकांना त्यांच्या साहित्याने साद घातली आणि या लेखक-दिग्दर्शकांच्या प्रतिभेतून उत्तम चित्रपट निर्माण झाले. जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहेत.
- उमा कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका