शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

माळरानावर फुलली शेती, वर्षभराचा मिटला पाणीप्रश्न

By admin | Updated: October 14, 2016 08:51 IST

गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष न गेलेल्या पाझर तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली, आज तोच पाझर तलाव सटानेच्या गावकऱ्यांसाठी वरदान ठरला.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि.१४ -  गेल्या वर्षाची गोष्ट, पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेलेला, नदी कोरडी ठाक पडलेली तर विहिरींनीही तळ गाठलेला. थंडीच्या सुरुवातीलाच दीड हजार लोकसंख्येच्या सटाने गावाला पाणीटंचाईने वेढलेले. अस्मानी संकटापुढे संपूर्ण गावापुढेच उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलेला. अशावेळी पाण्यासाठी शासन दरबारी टॅँकरसाठी प्रयत्न सुरू झाले, एकदाचा टॅँकर मंजूर झाला, पण त्याचे पाणी किती व कोणाला पुरणार? मग आठवण झाली १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळात होरपळून निघणाऱ्या जनतेच्या हाताला काम देण्याबरोबरच, पंचक्रोशीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेल्या पाझर तलावाची. गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष न गेलेल्या पाझर तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली, आज तोच पाझर तलाव सटानेच्या गावकऱ्यांसाठी वरदान ठरला. तलावातील गाळाने माळरान तर फुलविलेच, पण सात दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ग्रामस्थांची तहान कायमची भागवली. राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्याची जबाबदारी असलेल्या महसूल खात्याने नांदगाव तालुक्यातील सटाने ग्रामस्थांना जागे केले. अनकाई डोंगरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या व एक हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या सटाने या गावाला उन्हाळ्यातील पाणीटंचाई जणू पाचवीलाच पुजलेली, त्यातच १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर येथील शेती पूर्णत: फक्त पावसावरच अवलंबलेली अशा परिस्थितीत फक्त खरीप हंगामावर भीस्त ठेवून असलेल्या सटाने ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यास महसूल खाते यशस्वी झाले. अनकाई डोंगर रांगाच्या उतरावरून येणारे, परंतु आडकाठी नसल्याने वाहून जाणारे पाणी शिवारातच अडविण्यासाठी गाळाने भरलेल्या पाझर तलावाचे काम हाती घेण्यात आले. दोन कोटी ३५ लाख रुपये किमतीचे ग्रामस्थांनी केलेले श्रमदान व महसूल खात्याने उपलब्ध करून दिलेल्या यंत्रसामुग्रीच्या जोडमुळे बघता बघता पाझर तलावातील एक लाख ३५ हजार ब्रास म्हणजेच तीन लाख २६ हजार ७०० घनमीटर क्षेत्रावरील गाळ उपसण्यात आला व दुर्लक्षित झालेल्या पाझर तलावाला जलयुक्त शिवार अभियानाने पुनर्वैभव प्राप्त करून दिले. गावाच्या एकजुटीने शिवाराचे सारे रूपडेच आता बदलले. पाझर तलावातून उपसलेला गाळ माळरानावरील शेतकऱ्यांनी उचलून नेला होता, त्याची जागा आता शेती फुलविण्यात झाली आहे. निसर्गाची साथ व जमिनीच्या पोतीत कमालीचा बदल झाल्याने जवळपास साडेतीनशे एकरवर झेंडूच्या बागा, बाजरी व मक्याचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांचे चेहरेही फुलले आहेत. अनकाई डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याला अनकाई व सटाने दरम्यान सात लहान बंधाऱ्यांची आडकाठी असली तरी यंदा पहिल्यांदाच हे बंधारेही पूर्ण क्षमतेने भरले आहेत, ते भरल्याशिवाय सटाने येथील मोठ्या तलावात पाणी पोहोचत नाही. परतीच्या पावसाने चांगलीच साथ दिल्याने सटानेचा तलाव नुसता भरलाच नाही, तर ओव्हरफ्लो होऊन तुडुंब वाहिल्याने त्याचे पाणी पुढे जाऊन नागासाक्या धरणाला जाऊन मिळाले आहे. म्हणजेच सटाने गावाचा पाणीप्रश्न सुटण्याबरोबर नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनांनाही हातभार लागला आहे. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा...शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सटाने गावातील पाझर तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेताना महसूल विभागाची काहीशी दमछाक झाली. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने १९७२ मध्ये हा तलाव उभारताना त्यासाठी जागा संपादित केली व त्याचा रितसर मोबदलाही संबंधितांना अदा केला होता. कालांतराने या तलावातील पाण्याची जागा गाळाने घेतली व तलावाच्या जागेवरच पुन्हा मूळमालकांनी शेती करायला सुरूवात केली. ज्यावेळी गाळ काढायचा विषय चर्चिला गेला तेव्हा त्याला तितक्याच मोठ्या प्रमाणात विरोधही झाला. तलावाचा गाळ काढल्यास आम्ही शेती कुठे करायची असा प्रश्न विचारला जाऊ लागल्यावर नांदगावच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी, तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन, मंडळ अधिकारी कैलास चौधरी यांनी समस्त गावकऱ्यांना एकत्र करून अगोदर तलावाचे महत्त्व विषद करून देतानाच, त्यात साठणाऱ्या पाण्याचे फायदे सांगितले. आज जेव्हा सटाने शिवारातील माळरान फुलले तेव्हा ग्रामस्थांना जलयुक्तचे महत्त्व पटले व त्याचबरोबर सरकारी यंत्रणेच्या आभारासाठी हातही जोडले गेले.