शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत मिळाली ५३,७२७ कोटींची नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 09:43 IST

त्यापैकी २६,४८४ कोटी रुपये पीकविम्याचे आहेत

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मागील पाच वर्षांत अवकाळी पाऊस, दुष्काळ व इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ५३,७२७ कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली. त्यांपैकी २६,४८४ कोटी रुपये पीकविम्याचे आहेत.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना २७,२४३.४२ कोटी रुपयांची मदत दिलेली आहे. वारंवार होणाऱ्या पीक नुकसानीसाठी राज्याने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ)मधून निधी वापरला आहे. तसेच अत्यंत विपरीत स्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ)कडून अतिरिक्त मदत मागितली आहे. हे उपाय थेट भरपाई न म्हणता मदत म्हणून वर्गीकृत केले जातात. राज्य वारंवार होणाऱ्या शेतीच्या नुकसानीशी झुंजत असल्यामुळे सरकार आर्थिक मदत वाढवत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान-आधारित पीक विमा योजना (डब्ल्यूबीसीआयएस) अंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत एकूण २६,४८४ कोटी रुपये मिळाले. 

कोणत्या मुद्द्यांवर तज्ज्ञांनी दिला आहे भर?

महाराष्ट्राला हवामानाशी संबंधित कृषी आव्हानांचा सामना करावा लागत असताना दीर्घकालीन शाश्वत पद्धती, सुधारित सिंचन प्रणाली व हवामान-अनुकूल पिकांचा व्यापक अवलंब करण्याच्या गरजेवर तज्ज्ञांनी भर दिला आहे. याबरोबरच शेतीच्या धोरणांमध्ये संरचनात्मक बदल व शाश्वत शेतीमध्ये वाढलेली गुंतवणूक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे.

ठिबक सिंचनासाठी केंद्राकडून मदत

२०२३-२४मध्ये पीक विमा दाव्यांचे ८,५२०.१८ कोटी रुपये वितरित करण्यात आले. २०१५पासून ‘पर ड्रॉप मोर क्रॉप (पीडीएमसी) अंतर्गत राज्यातील १०.२५ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर ठिबक व स्प्रिंकलर सिंचनासाठी केंद्राने २,६०६.५५ कोटी रुपयांची मदत दिलेली आहे.

२१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळाले हवामान प्रशिक्षण

सन २०१८ पासून हवामान अनुकूल कृषी प्रकल्प (पीओसीआरए) अंतर्गत राज्यातील २१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचन पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी व शेतीवरील हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याचे धोरण विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास

मोहीम (एमआयडीएच), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसारख्या राज्य व केंद्र सरकारच्या योजनांतर्गत शेतकऱ्यांना शेततळे, विहिरी व सिंचन प्रणालींसाठी आर्थिक मदत दिली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा