शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका रखडल्या

By admin | Updated: July 26, 2014 00:56 IST

मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय.बी.कॉम आणि टी.वाय.बी.ए. या परीक्षांचे निकाल जाहीर होऊन बराच कालावधी लोटला तरी अद्याप विद्याथ्र्याना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या  टी.वाय.बी.कॉम आणि टी.वाय.बी.ए. या परीक्षांचे निकाल जाहीर होऊन बराच कालावधी लोटला तरी अद्याप विद्याथ्र्याना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. महाविद्यालये, एमकेसीएल आणि विद्यापीठामध्ये समन्वय नसल्याने गुणपत्रिका रखडल्या आहेत. या प्रकाराने विद्यापीठाने गोंधळाची परंपरा कायम ठेवली आहे.
टी.वाय.बी.कॉम परीक्षेला विद्यापीठातून सुमारे 65 हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षेचा निकाल जाहीर झाला तरी अद्याप हजारो विद्याथ्र्याना मूळ गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार प्रथम, द्वितीय परीक्षांचे गुण महाविद्यालये एमकेसीएलमार्फत विद्यापीठाकडे पाठवितात. सर्व सेमिस्टरच्या गुणांच्या आधारानुसार विद्याथ्र्याना श्रेणी दिली जाते. मात्र, एमकेसीएलकडून सुमारे आठ हजार विद्याथ्र्याचे गुण विद्यापीठाकडे अद्याप आले नसल्याने या विद्याथ्र्याच्या गुणपत्रिकाच तयार झालेल्या नाहीत. एमकेसीएलकडून प्रथम आणि द्वितीय वर्षाचे गुणच आले नसल्याने विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका तयार झाल्या नसल्याचे विद्यापीठातील सूत्रंनी सांगितले.
राज्यातील इतर विद्यापीठांतील अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आली तरी विद्यापीठातील विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. यामुळे विद्याथ्र्याना मुंबईबाहेर शिक्षणासाठी जायचे असल्यास त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. तसेच नोकरीसाठी गुणपत्रिकेची मागणी झाल्यास विद्याथ्र्याला नोकरी गमवावी लागणार आहे. गुणपत्रिकेच्या मागणीसाठी विद्यापीठात दररोज हजारो विद्यार्थी चकरा मारत असून त्यांना केवळ निकाल लवकरच देण्यात येतील, अशी फुटकळ आश्वासने देण्यात येत आहेत. यामुळे विद्यापीठाच्या या कारभाराला विद्यार्थीही कंटाळले आहेत. याबाबत परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
 
विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका विद्याथ्र्याना बसत आहे. यामुळे एमकेसीएलला दिलेले कंत्रट रद्द करण्यात यावे. तसेच विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका तातडीने देण्यात याव्यात, असे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले.