शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीसाठी ‘संवाद पथक मोहीम’ !

By admin | Updated: January 14, 2017 01:02 IST

वाशिम जिल्हा परिषदेच्या मोहिमेची राज्य स्तरावर दखल.

संतोष वानखडेवाशिम, दि. १३- कुपोषणाचे प्रमाण कमी करणे आणि कुपोषणासंदर्भात इत्थंभूत माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने राबविलेल्या गृहभेट संवाद मोहिमेची राज्य शासनाने दखल घेतली असून, आता ही मोहीम राज्यभर १२ ते २६ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे.कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे जन्मत: अनेक मुले कुपोषणाला बळी पडतात. जन्मत: कमी वजन, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, आयोडीनची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण व जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे मानली जातात. याशिवाय माता आणि किशोरवयीन मुलींनादेखील अनेक समस्या भेडसावतात. या विषयासंदर्भात कुटुंबीयांशी सुसंवाद साधून त्यांची परिस्थिती समजून घेणे, आजार होऊ नये म्हणून सतर्कता कशी बाळगावी, यासह आरोग्य शिक्षणाची माहिती देण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने १३ ते ३१ डिसेंबर २0१६ या दरम्यान गृहभेट संवाद मोहीम राबविली. या मोहिमेची दखल राज्य शासनाने घेतली असून, स्वतंत्र परिपत्रक काढून संपूर्ण राज्यभर ही मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या. महिला व बाल विकास विभागातर्फे राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन, पोषण चळवळ अंतर्गत ही मोहीम राबवायची असल्याने, या मोहिमेचा शुभारंभ राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीपासून १२ जानेवारीला करण्यात आला. किशोरींचा आत्मसन्मान  जागविण्यासाठी, गर्भवती मातांच्या पोटी सुदृढ बाळ जन्मण्यासाठी, बाळाला स्तनपानाचा हक्क मिळवून देण्यासाठी, बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा घडविण्यासाठी कुटुंबीयांशी सुसंवाद साधता यावा, म्हणून ही मोहीम २६ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता व ५ वर्षांंपर्यंतची मुले व मुली यांना पोषणाचे महत्त्व आणि त्यापासून होणारे फायदे याविषयी समाजामध्ये विशेषत कुटुंबामध्ये चर्चा होणे व त्यांची मानसिकता बदलविणे, आहारसंदर्भात समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करणे, माता व बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचे कार्य या मोहिमेंतर्गत करावे लागणार आहे.कुपोषण, माता व किशोरवयीन मुलींच्या समस्या, पोषण आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, यासंदर्भात वाशिम जिल्हा परिषदेने डिसेंबर २0१६ मध्ये गृहभेटीतून कुटुंबीयांशी संवाद साधणारी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेतून अनेक बाबी समोर आल्या. त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे. वाशिममधील या मोहिमेच्या धर्तीवर आता राज्य शासनाने ह्यसंवाद पथक मोहीमह्ण सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गतही कुटुंबीयांशी संवाद साधला जात आहे. - गणेश पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.