शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन BJP नेते चौकशा लावतात”; धनंजय मुंडेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 19:41 IST

धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली असून, केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन भाजप नेते चौकशा लावतात, असा आरोप केला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन BJP नेते चौकशा लावतातसुरुवातीपासूनच भाजपकडून अतिशय बदल्याचे राजकारण केले जात आहेधनंजय मुंडे यांचे भाजपवर जोरदार टीकास्त्र

नगर: गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. आताच्या घडीला शिवसेना नेते अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत असून, यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला जात आहे. यातच आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली असून, केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन भाजप नेते चौकशा लावतात, असा आरोप केला आहे. (dhananjay munde criticised bjp over ed cbi action on maha vikas aghadi leaders)

“ठाकरे व पवार पाठीत खंजीर खुपसणारे राजकारणी, हे चंद्रकांत पाटलांचे वास्तववादी भाष्य”

भाजपचे नेते ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा अनेक केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन विरोधी नेत्यांच्या चौकशा लावते. सुरुवातीपासूनच भाजपकडून अतिशय बदल्याचे राजकारण केले जात आहे. हे केवळ महाराष्ट्राला नाही, तर संपूर्ण देशाला कळून चुकले आहे, या शब्दांत धनजंय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

खरे काय हे सर्वांच्या समोर येणार आहे

खरे काय हे सर्वांच्या समोर येणार आहे. सीबीआय प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लिन चीट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गृहमंत्री राहिलेल्या व्यक्तीलाही बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. हे भाजपचे ठरलेले तंत्र आहे, असा दावा करत ३० वर्षांपासून अधिकारी एकाच ठिकाणी काम करत असतील, तर त्यांची बदली व्हायला पाहिजे. हे स्वाभाविक आहे. कायदा-नियमाला धरून सर्व बदल्या केल्या आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

“BJP नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”; काँग्रेसचा खोचक टोला

राज्य सरकार सकारात्मक

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर आला म्हणून नुकसान झाले. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. प्राथमिक किती नुकसान झाले हे आम्हाला सांगितले आहे. मात्र, वास्तविक किती नुकसान झाले याचा अहवाल यायला दोन-तीन दिवस लागतील, पण जे काही नुकसान झाले त्याबाबत भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. 

TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड

दरम्यान, केवळ महिला घरात होत्या, असे असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयावर घरात जाऊन कारवाई करण्यात आली. हे चुकीचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणात, देशाच्या राजकारणात अशा प्रकाराला कधीच जागा नव्हती. महाविकास आघाडीचे काम आणि जनसामान्यांमध्ये महाविकास आघाडीबद्दल जे प्रेम आहे, ते गेल्या दीड वर्षात चांगल्या रितीने चाललेले आहे. राज्य सरकारची लोकप्रियता वाढत चालली आहे. दुसरे काही विषय नसल्यामुळे सत्तेचा गैरवापर केला जातोय. याआधी अशा प्रकारचे दडपशाहीचे काम पाहिलेले नाही, असा यंत्रणेचा वापर केव्हाही पाहिलेला नाही. ईडी, सीबीआय हे सरकारी नियंत्रणात आहेत, त्यांच्या संघटनेतील माहिती लीक कशी होते ती कशी केली जाते? सुडाचे राजकारण कधी ऐकलेले नाही, महाराष्ट्रात हे राजकारण टिकणारे नाही, केंद्र सरकारची वागणूक अतिशय दुर्दैवी आहे, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीबीआय कारवाईवरून टीकास्त्र सोडले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAnil Parabअनिल परबAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना