शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन BJP नेते चौकशा लावतात”; धनंजय मुंडेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 19:41 IST

धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली असून, केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन भाजप नेते चौकशा लावतात, असा आरोप केला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन BJP नेते चौकशा लावतातसुरुवातीपासूनच भाजपकडून अतिशय बदल्याचे राजकारण केले जात आहेधनंजय मुंडे यांचे भाजपवर जोरदार टीकास्त्र

नगर: गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. आताच्या घडीला शिवसेना नेते अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत असून, यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला जात आहे. यातच आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली असून, केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन भाजप नेते चौकशा लावतात, असा आरोप केला आहे. (dhananjay munde criticised bjp over ed cbi action on maha vikas aghadi leaders)

“ठाकरे व पवार पाठीत खंजीर खुपसणारे राजकारणी, हे चंद्रकांत पाटलांचे वास्तववादी भाष्य”

भाजपचे नेते ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा अनेक केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन विरोधी नेत्यांच्या चौकशा लावते. सुरुवातीपासूनच भाजपकडून अतिशय बदल्याचे राजकारण केले जात आहे. हे केवळ महाराष्ट्राला नाही, तर संपूर्ण देशाला कळून चुकले आहे, या शब्दांत धनजंय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

खरे काय हे सर्वांच्या समोर येणार आहे

खरे काय हे सर्वांच्या समोर येणार आहे. सीबीआय प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लिन चीट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गृहमंत्री राहिलेल्या व्यक्तीलाही बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. हे भाजपचे ठरलेले तंत्र आहे, असा दावा करत ३० वर्षांपासून अधिकारी एकाच ठिकाणी काम करत असतील, तर त्यांची बदली व्हायला पाहिजे. हे स्वाभाविक आहे. कायदा-नियमाला धरून सर्व बदल्या केल्या आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

“BJP नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”; काँग्रेसचा खोचक टोला

राज्य सरकार सकारात्मक

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर आला म्हणून नुकसान झाले. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. प्राथमिक किती नुकसान झाले हे आम्हाला सांगितले आहे. मात्र, वास्तविक किती नुकसान झाले याचा अहवाल यायला दोन-तीन दिवस लागतील, पण जे काही नुकसान झाले त्याबाबत भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. 

TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड

दरम्यान, केवळ महिला घरात होत्या, असे असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयावर घरात जाऊन कारवाई करण्यात आली. हे चुकीचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणात, देशाच्या राजकारणात अशा प्रकाराला कधीच जागा नव्हती. महाविकास आघाडीचे काम आणि जनसामान्यांमध्ये महाविकास आघाडीबद्दल जे प्रेम आहे, ते गेल्या दीड वर्षात चांगल्या रितीने चाललेले आहे. राज्य सरकारची लोकप्रियता वाढत चालली आहे. दुसरे काही विषय नसल्यामुळे सत्तेचा गैरवापर केला जातोय. याआधी अशा प्रकारचे दडपशाहीचे काम पाहिलेले नाही, असा यंत्रणेचा वापर केव्हाही पाहिलेला नाही. ईडी, सीबीआय हे सरकारी नियंत्रणात आहेत, त्यांच्या संघटनेतील माहिती लीक कशी होते ती कशी केली जाते? सुडाचे राजकारण कधी ऐकलेले नाही, महाराष्ट्रात हे राजकारण टिकणारे नाही, केंद्र सरकारची वागणूक अतिशय दुर्दैवी आहे, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीबीआय कारवाईवरून टीकास्त्र सोडले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAnil Parabअनिल परबAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना