शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
4
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
5
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
6
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
7
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
8
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
9
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
10
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
11
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
12
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
13
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
14
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
15
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
16
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
17
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
18
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
19
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
20
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : "मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या चिंताजनक; आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 18:08 IST

CoronaVirus News : मृत्यू प्रमाणपत्रात अन्य काही कारण नमूद करून अंत्यविधीसाठी दिलेल्या काही मृतदेहांचा कालांतरानं चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात कमी होत असलेल्या चाचण्या, राज्यात मृत्यूसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ चिंताजनक आहे. तसेच मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक अथवा अन्य कारण नमूद करून अंत्यविधीसाठी मृतदेह दिले जात असल्याने निर्माण झालेले धोक्यांकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. मृत्यू प्रमाणपत्रात अन्य काही कारण नमूद करून अंत्यविधीसाठी दिलेल्या काही मृतदेहांचा कालांतरानं चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पत्रात फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून लिहितात, कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना मुंबईत सातत्यानं कमी चाचण्या होत असल्याकडे यापूर्वीसुद्धा मी आपले लक्ष वेधले आहे आणि आता राज्यात कोरोनाबळींची  संख्या दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत असताना आज पुन्हा या महत्त्वाच्या विषयाकडेच मला आपले लक्ष वेधायचे आहे. १ मे २०२० रोजी महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांमध्ये मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणे हे ५६ टक्के होते. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक चाचण्या या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत होत होत्या, १५ मे २०२० रोजी हे प्रमाण ४०.५ टक्क्यांवर आणण्यात आले आणि आता ३१ मे २०२० रोजीची आकडेवारी पाहिली तर एकूण महाराष्ट्रातील चाचण्याच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे २७ टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच पूर्वी होणाऱ्या चाचण्यांपैकी ५० टक्क्यांहून कमी आलेली आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या ही निश्चित चिंताजनक बाब आहे.  

काल मुंबई निसर्ग वादळातून वाचली. एनडीआरएफ, एसडीआरएफ यांसारख्या संस्थांनी चांगलं काम केलं. ते सारेच कौतुकास पात्र आहेत. पण कोरोनाच्या घोंघावत असलेल्या वादळाचीसुद्धा आपल्याला तितक्याच गांभीर्यानं दखल घ्यावी लागेल. मुंबईत चाचण्याची संख्या वाढवावीच लागेल, कोरोना बळी स्पष्टपणे दर्शविले, तरच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण होईल आणि परिणामी कोरोना आणखी पसरण्यापासून रोखता येईल. १० हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ ३५०० ते ४००० चाचण्याच मुंबईत होत आहेत. कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, तर कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव आवश्यक आहे. आपण या प्रश्नात लक्ष घालाल, अशी आशा आहे. असे केल्यास कोरोना वादळापासून आपली सुटका लवकर होणे शक्य आहे, असा सल्लाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

हेही वाचा

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का; गुजरातच्या दोन आमदारांचा राजीनामा

चीनच्या 'या' मोठ्या मोबाइल कंपनीकडून भारताची फसवणूक, तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा?

PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस