OBC Reservation: “गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 04:40 PM2021-06-03T16:40:08+5:302021-06-03T16:41:39+5:30

OBC Reservation: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवारांनी आदरांजली वाहिली.

devendra fadnavis criticises thackeray govt over obc reservation | OBC Reservation: “गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती”

OBC Reservation: “गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती”

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांनी दिला गोपीनाथ मुंडे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळादिवंगत नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

मुंबई: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवारांनी आदरांजली वाहिली. यासह एका Postal Envelope चे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपचे अनेक नेते डिजिटल माध्यमातून उपस्थित झाले होते. यावेळी भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच गोपीनाथ मुंडे असते, तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. (devendra fadnavis criticises thackeray govt over obc reservation)

दिवंगत नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे आज असते तर, ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न 

राज्यातील राजकारणासह गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय राजकारणातही आपली चमक दाखवली. गोपीनाथ मुंडे यांनी मोठा काळ विरोधी पक्षात घालवला. पुढे युतीची सत्ता आली त्यात ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बनले. गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केलेच. सोबतच ते शेतकऱ्यांचे नेते होते. विधानसभेत गोपीनाथ मुंडे यांना ऐकण्यासाठी सर्व सदस्य उत्सुक असायचे. गोपीनाथ मुंडे यांचे विचार, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे फडणवीस म्हणाले. 

लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल 

ते जननायक आणि लोकनायक बनले

काही लोक सामान्य म्हणून जन्माला येतात. पण त्याचे कार्य असामान्य असते. गोपीनाथ मुंडे त्यापैकीच एक होते. मुंडे यांना लोकनेता म्हटले जाते. ते जननायक आणि लोकनायक बनले. एका छोट्या गावातून येऊन त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. मुंडेंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेता बनवले. त्यांच्यासोबत राज्यात आणि विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. ते नेहमी सांगायचे की सत्तेसोबत कधी समझोता केलात तर कधीही नेता बनू शकत नाही. सत्तेसोबत संघर्ष केलात तर तुम्ही नेता बनू शकता, असे देवेंद्र फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.  
 

Web Title: devendra fadnavis criticises thackeray govt over obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.