शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी भ्रमाचा भोपळा !

By admin | Updated: March 19, 2015 01:07 IST

शेतकऱ्याने पाच वर्षांचा हिशेब मांडला तर दोन वर्षे दुष्काळाची, दोन सर्वसाधारण आणि एक सालमान अनुकूल असा ढोबळ जमा-खर्च दिसतो. ज्या वर्षी पीकपाणी समाधानकारक असते,

शेतकऱ्याने पाच वर्षांचा हिशेब मांडला तर दोन वर्षे दुष्काळाची, दोन सर्वसाधारण आणि एक सालमान अनुकूल असा ढोबळ जमा-खर्च दिसतो. ज्या वर्षी पीकपाणी समाधानकारक असते, त्यावर्षी शेतमालाचे भाव कोसळलेले असतात. एकूण दिवस चांगले-वाईट, कसेही असले तरी त्यांचा खिसा रिकामाच असतो. राज्यात ८० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक, ज्यांना जमीन कसायला परवडत नाही आणि शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. दुष्काळ, गारपीट पाठ सोडायला तयार नाही. शेतमालाचे भाव कोसळलेले आहेत. अशा परिस्थितीत बदललेले सरकार अर्थसंकल्पातून दिलासा देईल, असा एक भाबडा विश्वास शेतकऱ्यांचा होता; कारण विरोधी पक्षात असताना हीच मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुटून पडत होती. त्यामुळे हा विश्वास दुणावला होता; पण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात घोषणा मोठ्या असल्या तरी प्रत्यक्षात फार काही हाती लागलेले नाही.शेतकरी कर्जबाजारी आहे. सावकारांच्या कर्जात तो अडकला. त्यातून सुटका करण्यासाठी सरकारने १७१ कोटींची तरतूद केली. २ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असले तरी, केवळ परवानाधारक सावकारांकडूून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना हा दिलासा मिळेल आणि हे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. बिगर परवानाधारक सावकारांच्या कर्जाचे काय? त्याची नोंद नाही. त्यामुळे ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. तीच गोष्ट आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या मोतीराम लहाने पथदर्शी कृषी समृद्धी योजनेची. अल्पभूधारक शेतकऱ्यांना याद्वारे यंत्रासाठी अनुदान मिळणार आहे. अल्पभूधारकाची अवस्था ना बैलजोडी बाळगायची, ना ट्रॅक्टर. सौर कृषी पंपांची योजना सरकारने जाहीर केली. ७,५४० सौरपंप बसविण्यात येतील; पण या पंपांच्या कार्यक्षमतेविषयीच तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. त्यावर वादही झडले असताना ही योजना शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरू शकते, ही शंकाच आहे.अर्थमंत्र्यांनी सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी भरीव मदत केली. ७,२७२ कोटी रुपये खर्च करून राज्यातील अपूर्णावस्थेतील ३६ प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. सरकारला ६९,००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणायचे आहे. अशा बऱ्याच योजना या अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आणि ह्यसुजलाम सुफलामह्ण महाराष्ट्राचे एक चित्र रंगविले. ते रंगविताना शेतीचा विकास दर ४ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्धार दाखविला. गेल्या काही वर्षांत शेतीचा विकास दर झपाट्याने खाली येत आहे आणि शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या दुसऱ्या कामांकडे वळताना दिसते. जगभरातील ही स्थिती असल्याने महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. यातील विरोधाभास लक्षात घ्यायला हवा. शेतीचे उत्पन्न कमी असले तरी उत्पादन वाढलेले दिसते; पण अन्नधान्याच्या किमती वाढल्या नाहीत. म्हणजे उत्पादन वाढले; पण त्याला अपेक्षित किंमत मिळाली नाही. त्यामुळे शेतीचा विकास दर घसरला आणि तो वाढवायचा असेल तर शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतीचे खरे दुखणे येथे आहे. शेतीवरील खर्च वाढला; पण उत्पन्नाला भाव नाही. याच्यावर कोणताच उपाय अर्थसंकल्पात दिलेला नाही. शेतीचे रुतलेले चाक काढायची इच्छाशक्ती असती तर सरकारने त्याचा विचार केला असता.शेतीचे प्रश्न हे अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. खते, बियाणे, मजुरी या फेऱ्यांत तो अडकला आणि दुसरीकडे त्याला निसर्गाचे सतत फटके बसत आहेत. त्याला उभे करण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. सरकारने दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ३,६०० रुपयांची मदत केली.कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी १७२ कोटींची तरतूद, पण परवानाधारक सावकारांकडूून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना हा दिलासा मिळेल ७,५४० सौरपंप बसविण्यात येतील; या पंपांच्या कार्यक्षमतेविषयीच तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. त्यावर वादही झडले असताना ही योजना शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरू शकते, ही शंकाच आहे.७,२७२ कोटी रुपये खर्च करून राज्यातील अपूर्णावस्थेतील ३६ प्रकल्प पूर्ण करण्यात येतील