शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
3
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
4
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
5
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
6
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
9
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
10
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
11
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
20
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गुन्हेगारी वाढली

By admin | Updated: July 3, 2014 01:05 IST

होय, नागपुरातील गुन्हेगारी वाढली, ही प्रांजळ कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) संजीव दयाल यांनी आज येथे पत्रकारांसोबत बोलताना दिली. सोबतच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी

पोलीस महासंचालकांची स्पष्टोक्ती : आळा घालण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न
नागपूर : होय, नागपुरातील गुन्हेगारी वाढली, ही प्रांजळ कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) संजीव दयाल यांनी आज येथे पत्रकारांसोबत बोलताना दिली. सोबतच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दयाल आज सकाळीच नागपुरात आले. येथील पोलीस जिमखान्यात त्यांनी ठाणेदार, एसीपी,डीसीपींसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलले. पहिल्याच प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नागपुरातील क्राईम रेट वाढल्याचे मान्य केले. तक्रारी दाखल करून घेण्यास टाळाटाळ करायची आणि गुन्हे (क्राईम रेट) कमी असल्याचे दाखवायचे, असा प्रकार नागपूर पोलिसांकडून होत नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढल्याचे जाणवते. मात्र, त्यामागची अनेक कारणे आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी पोलीस प्रयत्नशिल असल्याचेही दयाल यांनी सांगितले.
आर्थिक गुन्हे वाढले
आर्थिक फसवणुकीची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया थोडीशी वेळखाऊ असल्याचे सांगतानाच पुराव्याची साखळी जोडण्यात फार वेळ जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, नागरिकांना गंडविणाऱ्यांना पोलीस सोडणार नाहीत, असेही दयाल म्हणाले. वाढत्या सायबर क्राईम आणि पोलीस कस्टडीतील मृत्यू तसेच सीसीटीव्हीसंदर्भात त्यांनी वेळकाढू उत्तर दिले. पोलिसांच्या रखडलेल्या बदल्यांबाबत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. दया नायक यांची नागपूर ग्रामीणमध्ये बदली होऊन चार महिने झाले. मात्र, ते अद्याप येथे रुजू झाला नाही. या संदर्भातही दयाल यांनी गोलमोल उत्तर दिले. नागपुरातील प्रस्तावित नवीन पोलीस ठाण्याला जागा मिळताच ते सुरू करण्यात येतील, असे दयाल म्हणाले. नागपूर मध्यवर्ती कारागृहात सर्रास मोबाईल, अंमली पदार्थ वापरले जात असून, आतमध्ये असलेले गुंड तेथूनच आपल्या साथीदारांकडून खंडणी वसूल करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले असता, कारागृह प्रशासन ही स्वतंत्र यंत्रणा आहे, ती आपल्या अखत्यारित नाही. त्यामुळे त्या संदर्भात आपण काही बोलू शकणार नाही, असे दयाल म्हणाले. यावेळी पोलीस आयुक्त कौशलकिशोर पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नक्षलवादाविरोधात केंद्राचे बळ
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी १० राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची बैठक घेतली. त्यात त्यांनी नक्षलवाद मोडून काढण्यासाठी सर्व साधन-सुविधा उपलब्ध करून देत पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे दयाल यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा भक्कम पुरावे मिळाले तेव्हा तेव्हा नक्षलवाद्यांची फ्रंट आॅर्गनायझेशन चालविणारे प्रो. साईबाबा, अँजेला आणि त्यांच्यासारख्या अनेकांना पोलिसांनी अटक केल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.