शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: राज्यातल्या निम्म्या चाचण्या केवळ मुंबई-पुण्यातच!, उर्वरित राज्याचे प्रमाण केवळ ३६ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 07:12 IST

देशातील एकूण चाचण्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. बाधितांच्या आकड्यातही राज्य आघाडीवर आहे.

- राजानंद मोरेपुणे : राज्यात आतापर्यंत झालेल्या कोविड चाचण्यांपैकी जवळपास निम्म्या चाचण्या मुंबईपुणे जिल्ह्यातच झाल्या आहेत. राज्यात झालेल्या एकुण ११ लाख ५८ हजार चाचण्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे ३१ व १८ टक्के चाचण्या झाल्या असून यात ठाणे जिल्हाही आघाडीवर आहे. हे तीन जिल्हे वगळल्यास राज्यातील उर्वरित चाचण्यांचे प्रमाण केवळ ३६ टक्के म्हणजे ४ लाखांच्या जवळपास आहे. या तीन जिल्ह्यांमध्येच सर्वाधिक संसर्ग असून हे प्रमाण ७६ टक्के एवढे आहे.

देशातील एकूण चाचण्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. बाधितांच्या आकड्यातही राज्य आघाडीवर आहे. राज्यात गुरूवारपर्यंत ११ लाख ५८ हजार कोविड नमुने संकलित करण्यात आले आहेत. तर रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार आहे. मुंबई व पुणे या दोन जिल्ह्यातच ५० टक्के चाचण्या झाल्या आहेत. या दोन शहरांमध्येच रुग्णसंख्याही ५० टक्क्यांहून अधिक आहे. ठाणे जिल्ह्यात पुण्यापेक्षा कमी म्हणजे सुमारे १ लाख ६६ हजार चाचण्या झाल्या असल्या तरी येथील रुग्णसंख्या  अधिक आहे. पुण्यात २ लाख १४ हजार चाचण्या झाल्या असून सुमारे ३३ हजार रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक ३ लाख ६० हजार चाचण्या झाल्या आहेत.उर्वरित महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यातील  चाचण्यांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेलेला नाही. एकूण ३६ पैकी १९ जिल्ह्यांमध्ये १० हजारांपेक्षा कमी चाचण्या झाल्या आहेत. सर्वात कमी १९६३ चाचण्या वाशीम जिल्ह्यातील असून तेथील रुग्णसंख्याही तुलनेत कमी आहे.राज्यात कोरोनाचा संसर्ग मुंबई, पुणे, ठाणे या शहरांपासूनच सुरू झाला. त्यामुळे सुरूवातीपासूनच तेथे चाचण्यांचे प्रमाण अधिक होते. लॉकडाऊनच्या काळात अन्य जिल्ह्यांत संसर्ग खूप कमी होता. त्यामुळे चाचण्या कमी झाल्या. अनलॉकमध्ये मोठ्या शहरांमधील संसर्गाचे प्रमाण वाढल्याने चाचण्याही वाढविण्यात आल्या. आता ग्रामीण भागातही संसर्ग वाढू लागल्याने चाचण्या वाढतील.- डॉ. प्रदीप आवटे,राज्य सर्वेक्षण अधिकारीलोकसंख्या २९ टक्के, चाचण्या ६३ टक्केराज्यात एकूण ११ कोटी २३ लाख लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण केवळ १ टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यात मुंबई, पुणे व ठाणे या तीन जिल्ह्यांची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) तीन जिल्ह्यांंची लोकसंख्या ३ कोटी २८ लाख (२९ टक्के) आहे. एकूण चाचण्यांच्या तुलनेत तीन जिल्ह्यांतील चाचण्यांचे प्रमाण ६३ टक्के आहे. सुमारे ७० टक्के म्हणजे ७ कोटी ९५ लाख लोकसंख्येसाठी हे प्रमाण केवळ ३७ टक्के एवढेच आहे.राज्याची एकुण लोकसंख्या व चाचण्यांचे तुलनेत काही शहरांतील चाचण्यांचे प्रमाण (२०११ च्या जनगणनेनुसार)जिल्हे लोकसंख्या चाचण्यामुंबई १ कोटी २४ लाख ३,६०,२४९पुणे ९४ लाख २९ हजार २,१४,८०७ठाणे १ कोटी १० लाख १,६६,१४१नागपूर ४६ लाख ५३ हजार ४७,४१८कोल्हापूर ३८ लाख ७६ हजार ३३,८२५औरंगाबाद ३७ लाख ३१,६८६नाशिक ६१ लाख सात हजार ३४,३१४महाराष्ट्र ११ कोटी २३ लाख ११,५८,३०५

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईPuneपुणेthaneठाणे