शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

पवार म्हणतात ५ कोटी, भुजबळ ६ कोटी, राष्ट्रवादी म्हणते १ कोटी... कुणाची आकडेवारी खरी, कुणाची खोटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 3:01 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला धान्यवाटपाचा आकडा छगन भुजबळ आणि माहिती-जनसंपर्कने दिलेल्या आकड्यापेक्षा वेगळाच आहे.

ठळक मुद्देरेशन दुकानांमधून गहू, तांदूळ आणि साखर वितरणाचं काम राज्यभरात सुरू आहे.छगन भुजबळांनीच एका मुलाखतीत ६ कोटी ८० लाख नागरिकांना अन्नधान्यवाटप करण्यात आल्याचं सांगितलं आहे.राज्याच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयाने दिलेला लाभार्थ्यांचा आकडा १ कोटी ४१ लाख ४३ हजार ६२६ आहे.

कोरोना संकटाचा मुकाबला करताना, कुणीही रिकाम्या पोटी राहणार नाही, या उद्देशाने रेशन दुकानांमधून गहू, तांदूळ आणि साखर वितरणाचं काम राज्यभरात सुरू आहे. १७ एप्रिल रोजी राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, १ ते १७ एप्रिल या कालावधीत राज्यातील १ कोटी ४१ लाख ४३ हजार ६२६ शिधापत्रिका धारकांना तब्बल ४९ लाख ८६ हजार ३६५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आलं आहे. ही माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्याचंही या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. परंतु, छगन भुजबळांनीच एका मुलाखतीत ६ कोटी ८० लाख नागरिकांना अन्नधान्यवाटप करण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्याचवेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलेला धान्यवाटपाचा आकडा तिसराच आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि महाराष्ट्र भाजपानेही त्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. सध्या रेशनवर अंत्योदय कार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ असे ३५ किलो धान्य वितरित केले जात आहे. केशरी कार्डधारकांना प्रतिव्यक्ती २ रुपये किलो दराने ३ किलो गहू व २ रुपये किलो दराने २ किलो तांदूळ वितरण होत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्यातर्फे या अन्नधान्य वाटपासंबंधीची आकडेवारी रोज प्रसिद्ध केली जाते. १ ते १५ एप्रिलदरम्यान १ कोटी ३५ लाख ५४ हजार शिधापत्रिकाधारकांना धान्यवाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर पेजवरही हाच आकडा आहे आणि हे ट्विट छगन भुजबळ यांनी रिट्विटही केलं आहे.

हे ट्विट १५ एप्रिल रोजी ७.३५ वाजता करण्यात आलंय. पण त्याआधी त्याच दिवशी दुपारी १.४७ वाजता शरद पवारांनी एक ट्विट केलंय. त्यात आज पर्यंत ५ कोटी ९ लाख गरजूंना ३८ हजार क्विंटल धान्य वाटप झाल्याचं म्हटलंय. हे ट्विटही छगन भुजबळांनी रिट्विट केलंय. या दोन्ही ट्विटमधील धान्यवाटप झालेल्या नागरिकांच्या आकड्यात मोठी तफावत दिसतेय.

त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे, छगन भुजबळांनी सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, १५ दिवसांत राज्यातील ६ कोटी ८० लाख नागरिकांना धान्यवाटप करण्यात आल्याचं म्हटलं आहे. हा आकडा आणखीच वेगळा आणि मोठा आहे.

प्रदेश भाजपानं या सगळ्या ट्विट्सचे स्क्रीन शॉट्स  घेऊन राज्य सरकारला जाब  विचारला आहे. महाराष्ट्र शासनाचा जनसंपर्क विभाग, सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे मुखपत्र सामना व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या तिघांनीही एकाच दिवशी नमूद केलेल्या आकड्यांमध्ये तफावत आढळते. ही महाराष्ट्राच्या जनतेची एकप्रकारची दिशाभूल नाही का?, असा सवाल त्यांनी केलाय.

  

आता राज्य सरकार काय खुलासा करतं, हे पाहावं लागेल. कुणी दिलेली आकडेवारी खरी आणि कुणाची खोटी, याचा फैसला त्यावरूनही होऊ शकेल. कोरोना संकटाच्या काळात राजकारण न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केलं आहे. मात्र, अन्नधान्यवाटपाचे हे वेगवेगळे आकडे राजकारणाचाच भाग तर नाहीत ना, अशी शंकाही या निमित्ताने व्यक्त होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSharad Pawarशरद पवारChhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा