शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

देशावर आलेली वेळ मानवनिर्मित; नागरिकांच्या मृत्यूचा सौदा करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान : पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:13 IST

कोरोनाच्या परिस्थितीवरू काँग्रेसकडून होत आहे टीका. मोदी हे देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान, पटोले यांची टीका.

ठळक मुद्देकोरोनाच्या परिस्थितीवरू काँग्रेसकडून होत आहे टीका.मोदी हे देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान, पटोले यांची टीका.

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. परंतु आता देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काँग्रेसकडून सातत्यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर सरकारवर टीका केली. "आपल्या देशावर जी वेळ आली आहे. ती मानवनिर्मित साथ आहे. पंतप्रधान हे भाजपचे आहेत, ते देशाचे नाहीत. त्यांनी देशाला कोरोनाच्या संकटात लोटले, मोदी यांनी ही परिस्थिती मुद्दाम आणली. हा प्लॅन असून, जागतिक पातळीवर हा प्लॅन झाला," असा आरोप त्यांनी यावेळी केला. जळगावमधील फैजपूर येथे बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 

"चीनचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी एकत्र आले होते आणि त्यानंतर १९ नोव्हेंबरला पहिला रुग्ण सापडला. हा जागतिक प्लॅन होता. आपल्या देशाच्या नागरिकांचा मृत्यूचा सौदा करणारे मोदी हे  जगातील एकमेव पंतप्रधान आहेत," असं म्हणत पटोले यांनी निशाणा मोदींवर निशाणा साधला. 

ताटं वाजवून कोरोना बरा झाला असता तर..."देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यात येतील असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख न देता लॉकडाऊन लावून देशवासीयांना घरात बसवले. कोरोना काळ‌ात उपाययोजना करण्यापेक्षा ताटं वाजविण्यावर मोदींनी भर दिला. ताटं वाजवून कोरोना बरा झाला असता तर रुग्णालयांची गरज भासली नसती," असाही चिमटा त्यांनी काढला. खाद्य तेल असो अथवा इंधन, यांच्या किंमती वाढवून मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटल्याचीही टीका त्यांनी केली.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी"देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कोरोना संदर्भात महत्वाचे सल्ले दिले होते. परंतु त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही याची किंमत देशाला हजारो बळी देऊन मोजावी लागली आहे. कालच राहुल गांधी  यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल इशारा देत योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे. मागील दोन लाटेत मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांमुळे निष्पाप लोकांचे बळी गेले. आतातरी सरकारने जागे व्हावे आणि वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात," असे नाना पटोले म्हणाले.

सात वर्षांत देशात अनागोंदी वाढलीमोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळात देशात अनागोंदी वाढली आहे. पीक वीमा योजनेतूनही शेतकऱ्यांना लुटले जात आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल मोठ्या प्रमाणात महाग झाले आहे, बरोजगारी वाढली आहे याविरोधात काँग्रेस लढा देत आहे. कोरोना संकटामुळे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यास बंधने आहेत मात्र काँग्रेसने कोरोनाचे नियम पाळून मोदी सरकारच्या विरोधात आंदोलने केली आहेत आणि पुढेही करत राहू. मोदी सरकारच्या काळात फक्त त्यांच्या मूठभर उद्योगपती मित्रांनाच लाभ झाला असून सर्वसामान्य जनता बेहाल झाली आहे. २०२४ च्या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देणार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पुन्हा स्वबळाचा नारा देत कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं आवाहनही केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीPraniti Shindeप्रणिती शिंदे