शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचा विधानसभा निकालांवर संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:06 IST

CM Devendra Fadnavis First Reaction On Raj Thackeray Statement: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त करणाऱ्या राज ठाकरेंवर महायुतीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहेत.

CM Devendra Fadnavis First Reaction On Raj Thackeray Statement: वरळी येथे मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला.  या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काही आक्षेप नोंदवत संशय व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन अनेक दिवस उलटले आहे. नंतर प्रथमच राज ठाकरे यांनी मेळाव्यात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांसमोर जाहीरपणे भूमिका मांडली. राज ठाकरे यांनी केलेल्या मतप्रदर्शनावरून भाजपासह महायुतीतील नेते राज ठाकरेंवर टीका करत आहेत. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकावर पहिली प्रतिक्रिया दिली. 

विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय कळला नाही, पचला नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती, ते म्हणाले 'इतना सन्नाटा क्यो है भाई, कोई तो जिता होगा... कोणीतरी जिंकलं ना मग जल्लोष का नाही? काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, मागील वेळी १०५ मिळाल्या होत्या. २०१४ साली १२२ जागा होत्या. भाजपाचे समजू शकतो, पण अजित पवारांना ४२ जागा कुणाचा तरी विश्वास बसेल का? त्याशिवाय जे इतके वर्ष राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावर हे लोक मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा मिळतात.  या सर्व न समजण्यासारख्या गोष्टी आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे प्रचारसभा, बैठका घेत आहेत.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, राज ठाकरे यांच्याबद्दल आपण महाराष्ट्रात बोलू, असे सांगत एका वाक्यात उत्तर दिले. तसेच दिल्ली विधानसभेत परिवर्तन होणार आहे. दिल्लीची जनता भाजपासोबत जाणार आहे. दिल्लीतील परिवर्तन महिला करणार आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार उलथवण्याचा निर्णय दिल्लीकरांनी घेतला आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी निवडणूक निकालाची दाखले देत चिरफाड केली. हा निकाल कसा लागला यावर संशय व्यक्त करत लोकसभेनंतर लगेचच तीन चार महिन्यात निकाल फिरतो कसा? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आपल्याला लोकांनी मतदान केले आहे. फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही, असा दावा करत आता आगामी निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसेmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024