शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 10:56 IST

जनता दरबारात कुठेही कुरघोडी नाही. आमचे विरोधक गडबड करत आहेत. महायुतीतील तिन्ही मजबुतीने काम करत आहेत असा दावाही संजीव नाईक यांनी केला.

ठाणे  - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपा एक्टिव्ह मोडवर आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराने महायुतीत भाजपा आणि शिवसेनेत कुरघोडी सुरू आहे का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यातच जनता दरबाराच्या आधी भाजपा नेत्यांनी ठाण्यात आढावा बैठक घेतली. त्याशिवाय पक्ष संघटना मजबूत करणे त्यात चुकीचे काही नाही असं विधान माजी खासदार संजीव नाईक यांनी केले आहे. जनतेत जाऊन लोकांची कामे करा असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्यानुसार ठाण्यात जनता दरबार भरवला जातोय असंही त्यांनी नमूद केले. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा भाजपा प्रयत्न करतंय का असा सवाल उपस्थित होत आहे.

माजी खासदार संजीव नाईक म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय त्यात चुकीचे काही नाही. पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना ताकद देणे हे प्रत्येक पक्षाने केले पाहिजे त्यातच लोकशाहीची ताकद आहे. जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे ठाण्यात आले होते तेव्हा त्यांनीही महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे हे म्हटलं होते. युती करायची की नाही हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. जे वरिष्ठ ठरवतील ते आम्हाला मान्य राहील असं त्यांनी सांगितले.

तसेच जनता दरबाराला विरोध करण्याचा प्रश्न आहे. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवावेत असं मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले आहे. मंत्रालयात काम घेऊन जाणाऱ्या लोकांची संख्या पाहता, मंत्रीच जनतेपर्यंत पोहचत आहेत. ठाणे जिल्हा खूप मोठा आहे. कुठेही गैरसमज होत असतील तर ते वरिष्ठ पातळीवर दूर करण्यात येतील. आमच्या जिल्ह्यातील तिन्ही मंत्री जोमाने लोकांचं काम करतील. जनता दरबारात कुठेही कुरघोडी नाही. आमचे विरोधक गडबड करत आहेत. महायुतीतील तिन्ही मजबुतीने काम करत आहेत असा दावाही संजीव नाईक यांनी केला.

दरम्यान, मंत्र्‍यांनी जितके जनतेत मिसळून काम करतील, जनतेशी संवाद साधतील त्यातून आपण जनतेला दिलेली वचने आहेत त्याची पूर्तता होईल. लोकांमध्ये जाऊन काम करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्‍यांना कानमंत्र दिला आहे. त्यानुसार भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक हे लोकांमध्ये जाऊन काम करतायेत. त्यासाठी ठाण्यात आम्ही आढावा बैठक घेतली. विविध खात्याचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी मिळून जनता दरबारात लोकांचे प्रश्न कसे सोडवले जातील. त्यांचे अर्ज घ्यायचे आणि संबंधित खात्यापर्यंत कसे पोहचतील याबाबत भाजपाकडून आढावा बैठक घेण्यात आली अशी माहिती संजीव नाईक यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGanesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा