शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरं केव्हा उघडणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 17:17 IST

लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी अनलॉकची घोषणा करत, देशातील आणि राज्यातीलही एक एक क्षेत्र लॉकडाउनमधून मुक्त करण्यास सुरूवात झाली. मात्र देशात अनेक ठिकाणची मंदिरे अद्यापही बंदच आहेत. याच मुद्द्यावर आता महाराष्ट्रातील मंदिरे तसेच इतर धार्मिक स्थळेही खुली करावीत, या मागणीने जोर धरला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. या काळात देशभरातील सर्व धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली. महाराष्ट्रील धार्मिक स्थळे तेव्हापासून बंदच आहेत. यानंतर लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी अनलॉकची घोषणा करत, देशातील आणि राज्यातीलही एक एक क्षेत्र लॉकडाउनमधून मुक्त करण्यास सुरूवात झाली. मात्र देशात अनेक ठिकाणची मंदिरे अद्यापही बंदच आहेत. याच मुद्द्यावर आता महाराष्ट्रातीलमंदिरे तसेच इतर धार्मिक स्थळेही खुली करावीत, या मागणीने जोर धरला आहे. मात्र आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत आपल्या मनात काय आहे, ते सांगितले आहे.

मंदिरे आणि धार्मिकस्थळे खुली करण्यसंदर्भात विनंत्या येत आहेत. मात्र, त्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगावी लागणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मंदिरे खुली करण्यासंदर्भात ठाकरे यांनी थेट भाष्य न केल्याने, तूर्तास तरी राज्यातील मंदिरे बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज पुणे विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथीळ कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. तेव्हा ते बोलत होते.

राज ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा -तत्पूर्वी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सरकारला पत्रही लिहिले आहे. यावर, मंदिरे खुली करण्याची मुख्यमंत्र्यांची मनापासून इच्छा आहे. ते लवकरच यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. राऊत यांनी ही प्रतिक्रिया द्यायला तासही होत नाही, तोच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंदिरांसंदर्भात आपण काय विचार करत आहोत, हे स्पष्ट केले आहे.

प्रकाश आंबेडकारांचे विठ्ठल मंदिर आंदोलन -यापूर्वी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही विठ्ठल मंदिराचे आंदोलन केले. यावेळी, आठ दिवसात मंदिरे खुली करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाष्यावरून सध्या तरी मंदिरे खुली होणार नाहीत, असाच संकेत मिळत आहे. 

इतर देशांच्या तुलनेत आपल्यासमोरील आव्हान मोठे -इतर देश फक्त कोविड एके कोविडचाच सामना करत आहेत. आपले तसे नाही. आपल्याकडे नुकताच गणेशोत्सव पार पडला, मोहरम झाला, आता नवरात्र, दसरा आणि दिवाळी आहे. त्यातच पाऊसही सुरू आहे. यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे, असेही ठाकरे म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रात कोविडचा वाढता संसर्ग चिंतेची बाब -पश्चिम महाराष्ट्रात कोविडचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर, आता ही साथ सांगली, सातारा आणि कोल्हापूरकडे सरकत आहे. हे निश्चितच जबाबदारी वाढवणार आहे. आपल्याकडे म्हण आहे, पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, तसेच, करोनासोबतच्या लढ्यात इतर काही जिल्ह्यांकडून ज्या चुका झाल्या त्या तुम्ही करू नका. असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

CoronaVaccine News : "अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या 4 लशी फेल होण्याची शक्यता"

शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रTempleमंदिरShiv Senaशिवसेना